मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २ मे || Dinvishesh 2 May ||




जन्म

१. सत्यजित रे , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२१)
२. विल्यम पेट्टी, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३७)
३. वसंतराव देशपांडे, भारतीय शास्त्रीय गायक (१९२०)
४. विजय चव्हाण , मराठी चित्रपट अभिनेते (१९५५)
५. अब्राहम गेस्नेर , कॅनाडियन भूगर्भशास्त्रज्ञ (१७९७)
६. ब्रायन लारा, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू (१९६९)
७. सौम्या स्वामिनाथन, भारतीय वैज्ञानिक (१९५९)
८. नीना वराकील, भारतीय लोंग जंप खेळाडू (१९९१)
९. रितू फोगाट, भारतीय महिला कुस्तीपटू (१९९४)
१०. डेव्हिड बॅकम , इंग्लिश फुटबॉलपटू (१९७५)
११. अमोज जॅकॉब, भारतीय क्रीडापटू (१९९८)

मृत्यु

१. लिओनार्डो दा व्हींची, इटलीचा चित्रकार (१५१९)
२. के. बालाजी, भारतीय चित्रपट निर्माते (२००९)
३. गिअल्लो नत्ता, इटालियन नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक(१९७९)
४. वी किम वी , सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
५. कोट्टायम पुष्पंनाथन, भारतीय लेखक (२०१८)
६. वीरेंद्र वर्मा, भारतीय राजकीय नेते (२००९)
७. पुरुषोत्तम काकोडकर, भारतीय राजकीय नेते (१९९८)
८. दिनकर केशव बेडेकर, विचारवंत (१९७३)
९. मोहनलाल पिरामल,  भारतीय उद्योगपती (२००१)
१०. शांताराम आठवले, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७५)
११. फिरोझ मेहता, भारतीय लेखक (१९९४)

घटना

१. हॅनिबल  गुडविन यांनी सेलुलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८७)
२. जर्मनीमध्ये अडोल्फ हिटलरने व्यापारी संघटनांवर बंदी घातली. (१९३३)
३. बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. (१९९४)
४. जनरल मोटर्सने शेवरेल मोटर कंपनी विकत घेतली. (१९१८)
५. एस राजेंद्रबाबू भारताचे ३४वे सरन्यायाधीश झाले. (२००४)
६. बाबाराव सावरकर व तात्याराव सावरकर यांची अंदमानातून पुन्हा भारतात पाठवणी  करण्यात आली. (१९२१)
७. अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून अबोटाबाद येथे लपून बसलेल्या कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा खातमा केला. (२०११)

महत्व

१. World Tuna Day
२. World Laughter Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...