मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ मे || Dinvishesh 12 May ||




जन्म

१. जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत ,लेखक (१८९५)
२. के. जी. बालकृष्णन, भारताचे ३७वे सरन्यायाधीश (१९४५)
३. सॅम नुजॉमा, नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
४. विजय भट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९०७)
५. गुलमरमो इंडारा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
६. अरुणा साईराम, भारतीय गायिका (१९६०)
७. रमनलाल देसाई, गुजराती लेखक (१८९२)
८. शिखा पांडे, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८९)
९. नंदू नाटेकर, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९३३)
१०. इ. एस. राजा गोपाल, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)

मृत्यू

१. सरत पुजारी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१४)
२. जेदर्झेज स्नियादेकी, भौतिकशास्त्रज्ञ (१८३८)
३. एम. ए. मुथिया चेट्टिर, भारतीय राजकीय नेते (१९८४)
४. नेली साचस, नोबेल पारितोषिक विजेती लेखिका (१९७०)
५. बेंजामिन शेअरस, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
६. कॉर्नेल बोरचर्स, जर्मन अभिनेत्री (२०१४)
७. माऊनो कोईविस्तो, फिनलॅडचे राष्ट्राध्यक्ष (२०१७)
८. जोहान पीटर, जर्मन कवी ,लेखक (१७९६)
९. जॉन एफ. हर्चेल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (१८७१)
१०. लूक व्हॅन ब्रबंत, फ्लेमिश लेखक ,कवी (१९७७)

घटना

१. भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. (१९५२)
२. राव जोधपूर यांनी राजस्थानमध्ये आधुनिक शहराचा पाया रचला, पुढे त्यांच्याच नावाने शहराचे नाव जोधपूर करण्यात आले. (१४५९)
३. चीनमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ६००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२००८)
४. अमेरिकेत पहिल्यांदाच विदेशी महिला राजदुतांची नेमणूक झाली.  भारताच्या विजया लक्ष्मी पंडीत यांनी तो पदभार सांभाळला. (१९४९)
५. एस एच कपाडिया हे भारताचे ३८वे सरन्यायाधीश झाले. (२०१०)
६. गाज सिंघ हे नवे जोधपूरचे महाराजा झाले. (१९५२)
७. पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००७)
८. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी covid १९ काळात २० लाख करोड रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. (२०२०)

महत्व

१. International Myalgic Encephalomylitis
२. International Nurses Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...