मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ एप्रिल || Dinvishesh 8 April ||



जन्म

१. रणजीत देसाई, साहित्यिक, लेखक (१९२८)
२. अल्लू अर्जुन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८२)
३. रामनारायण पाठक, गुजराती लेखक (१८८७)
४. जॉन आर हिक्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०४)
५. तणाझ इराणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
६. अमित त्रिवेदी, गायक संगीतकार (१९७९)
७. नित्या मेनन, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८७)
८. क्रिस्तोफ हैन, जर्मन लेखक (१९४४)
९. अणू मेहता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
१०. कुमार गंधर्व, भारतीय शास्त्रीय गायक (१९२४)

मृत्यु

१. नानासाहेब फाटक, मराठी रंगभूमी कलाकार (१९७४)
२. एरिक असेल कर्फेल्डत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३१)
३. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, लेखक, कवी, समाजसुधारक (१८९४)
४. रॉबर्ट बारण्य, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
५. प्योट्र कपिट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८४)
६. मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या पंतप्रधान (२०१३)
७. वसंत खानोलकर, समाजसुधारक (१९९९)
८. डॅनिएल बोवेट, नोबेल पारितोषिक विजेते औषध निर्माण शास्त्रज्ञ (१९९२)
९. अबेल मुझोरेव , झिंबाब्वेचे पंतप्रधान (२०१०)
१०. वालचंद हिराचंद दोशी, उद्योगपती (१९५३)

घटना

१. एरोसोल डिस्पेन्सरचे पेटंट जॉन डी लिंडे यांनी केले. (१८६२)
२. इको फार्म डेअरी या न्यूयॉर्क मधील कंपनीने पहिल्यांदाच दूध काचेच्या बाटलीत विकण्यास सुरुवात केली. (१८७९)
३. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमधील सेंट्रल असेम्ब्ली मध्ये राजकिय पत्रे उधळून धुराचे बॉम्ब टाकले, यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. (१९२९)
४. भारताने युनियन कार्बाईड विरूद्ध भोपाळ दुर्घटने बद्दल खटला दाखल केला.पुढे तो खटला अमेरिकन कोर्टाने फेटाळून लावला. (१९८५)
५. जपानचे पंतप्रधान मोरीहिरो होसोकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९४)
६. मायक्रोसफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर ४ बेटा हे व्हर्जन रिलिज केले. (१९९७)
७. हरयाणा गणा परिषद ही राजकिय पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी मध्ये विलीन झाली. (१९९९)

महत्त्व

१. अग्निशामक दल दिवस
२. विश्व बंजारा दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...