मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ एप्रिल || Dinvishesh 4 April ||



जन्म

१. परवीन बाबी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४९)
२. बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेटपटू (१९३३)
३. एन चंद्रा , भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५२)
४. हून सेन , कंबोडियाचे पंतप्रधान (१९५१)
५. जेनिफर लिंच, अमेरिकेन चित्रपट दिग्दर्शक निर्मात्या (१९६८)
६. पंडीत नारायणराव वाघ, गायक (१९०२)
७. टॅड लिंकन, अब्राहम लिंकन यांचे चिरंजीव (१८५३)
८. मेनन अल्विंग , अभिनेत्री (१९२३)
९. अँथोनी पर्किंस, अमेरिकेन अभिनेता (१९३२)
१०. एडवर्ड लुकास, फ्रेंच गणितज्ञ (१८४२)

मृत्यु

१. गंगाधर मेहेर, ओडिया साहित्यिक (१९२४)
२. मार्टिन ल्यूथर किंग, नोबेल पारितोषिक विजेते समाजसुधारक (१९६८)
३. जॉन नापियर, स्कॉटिश गणितज्ञ (१६१७)
४. विल्यम हेनरी हॅरिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४१)
५. सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९८७)
६. झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
७. आनंद साधले, साहित्यिक (१९९६)
८. बॉब क्लार्क, अमेरिकेन चित्रपट दिग्दर्शक (२००७)
९. व्हिक्टर ऑटो स्टॉम्प्स, जर्मन लेखक (१९७०)
१०. मॅक्स फ्रिश्च, लेखक (१९४१)

घटना

१. हिमाचल प्रदेश येथील कांग्रा शहरात झालेल्या भूकंपात वीस ते पंचवीस हजार लोक मृत्युमुखी पडले. (१९०५)
२. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
३.चीनने अधिकृतरित्या तिबेट हा रिपब्लिक ऑफ चीनचा प्रदेश असल्याचे जाहीर केले. (१९१२)
४. पनामा मधील कमुनिष्ट पार्टीची स्थापना झाली. (१९३०)
५. सेनेगलने फ्रान्सपासून स्वातंत्र्य जाहीर केले. (१९६०)
६. थायलंड मधील डेमॉक्रॅटिक पार्टीने सार्वत्रिक निवडणुक जिंकली. (१९७६)
७. जॅक मा यांनी चीनमधील इंटरनेट कंपनी अलिबाबाची स्थापना केली. (१९९९)
८. बोरिस टेडिक यांनी सर्बियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (२०१२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...