मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ एप्रिल || Dinvishesh 25 April ||




जन्म

१. शाहू मोडक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१८)
२. गुग्लिमो मार्कोनी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७४)
३. विपुल गोयल, भारतीय राजकीय नेते (१९७२)
४. हेमवाती नंदन बहुगुणा, भारतीय राजकीय नेते (१९१९)
५. सुषमा सेन, भारतीय राजकीय नेत्या (१८८९)
६. वुफांग पॉली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९००)
७. करण राजदान , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
८. श्रिया पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८९)
९. हैदर अली अबादी, इराकचे पंतप्रधान (१९५२)
१०. गेधून चोएखी न्यीमा, ११वे पांचेण लामा (१९८९)
११. अरिजित सिंघ , भारतीय चित्रपट पार्श्र्वगायक (१९८७)
१२. आर. पी. एन. सिंग , भारतीय राजकिय नेते (१९६४)
१३. कमाल खान , भारतीय गायक (१९८९)
१४. देविका, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४३)

मृत्यु

१. स्वामी रंगनाथानंद, शिक्षक, हिंदु साधू  (२००५)
२. चोंगझेन, चीनचा मिंग साम्राज्याचा शासक (१६४४)
३. पंढरीनाथ रेगे , साहित्यिक विचारवंत (१९९९)
४. उस्ताद बडे गुलाम अली खाँ , भारतीय गायक (१९६८)
५. अँडर्स सेल्सिअस, स्वीडिश खगोशास्त्रज्ञ (१७४४)
६. त्रिनले ग्यास्टो, तिबेटचे १२वे दलाई लामा (१८७५)
७. मिर सुलतान खाँ, उत्र्कृष्ट बुद्धिबळपटू (१९६६)
८. व्राईट मॉरिस, अमेरिकन लेखक (१९९८)
९. गिंगर रॉजर्स, अमेरिकन अभिनेत्री (१९९५)
१०. अमानुल्लाह, अफगाणिस्तानचा राजा (१९६०)

घटना

१. बेल लॅब्सने पहिली सोलर बॅटरी सिलिकॉन पासुन तयार केली. (१९५४)
२. पोर्तुगालने आपल्या संविधाना मध्ये संशोधन केले. (१९७६)
३. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. (२०००)
४. पायोनिअर १० अंतराळयान सूर्यमालेच्या बाहेर गेले. (१९८३)
५. अमागासाकी जपान येथे रेल्वे अपघातात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
६. भारतीय वंशाच्या नागरिकांना श्रीलंकेने मतदान करण्याचा अधिकार दिला. (१९८९)
७. महाभयंकर तोर्णदो मुळे अमेरिकेतील ३००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (२०११)
८. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात ९००० लोक मृत्युमुखी पडले. (२०१५)

महत्व

१. जागतिक मलेरिया दिवस
२. International Financial Independence Awareness Day
३. World Penguin Day 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...