मुख्य सामग्रीवर वगळा

शेतातली हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. साधारणतः पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा या भागात हुरडा पार्टीचे प्रमाण खूप पाहायला मिळते. यावेळी लोक दिवस दिवस रानात फिरून कोवळी ज्वारीची कणस खास हूर्ड्यासाठी निवडतात तर काही लोक खास आवर्जून हुर्ड्यासाठी ज्वारीच्या पिकाची पेरणी देखील करतात. साधारणतः मकर संक्रांती झाली की हुरडा पार्टीला सूरूवात होते त्यानंतर पुढचे महिना दिड महिना हूर्ड्यासाठी योग्य असतात, त्यानंतर कणसे पिवळी पडायला लागतात.



शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी एखाद्या झाडाखाली ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमिनीत एक आपटी केली जाते ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात. तर ही आपटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या पेटवून विस्तव तयार केला जातो. आग पूर्ण शांत झाल्यावर जो विस्तव पेटता राहतो त्यामध्ये ही कवळी ज्वारीची कणसे भाजली जातात. ती योग्य प्रकारे भाजली जावी याची काळजी घ्यावी लागते. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील भाजलेली ज्वारीचे कोवळे दाणे म्हणजे आपला हुरडा.

गरम गरम हा हुरडा आपल्या समोर आल्यानंतर त्याला खाण्याचा मोह आवरणार नाही हे नक्की. म्हणून त्यासोबत चवीने खायला गूळ, खारमुरे, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, शेव , फरसाण असे विविध प्रकार घेतले जातात. त्यामुळे चवीने खावा असा हुरडा खरंच खूप मस्त लागतो. ती धगधगणारी आपटी, ते सोबत खायच्या पदार्थांचे सुवास काही वेगळीच मजा आणतात. पुन्हा रानात फिरून खाल्लेला ऊस, ढाळा म्हणजे वेगळेच सुख असतं.


अशावेळी कित्येक हुरडा प्रेमी लोकांचा दिवस फक्त हुरडा खाण्यातच जातो. यासोबतच रानात जेवण्याची मजा काही वेगळीच असते कित्येक ठिकाणी अशा जेवणाचे बेतही होतात. रानातल्या चुलीवर केलेली भाकरी आणि भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. अशावेळी माणूस नेहमी पेक्षा जास्त जेवणार हे नक्की असतं. कारण रानातल्या वाऱ्याचा परिणाम तोच असतो. आभाळ म्हणजे छत , काळी माती खाली आणि समोर ठेवलेले ते सुंदर भाजी भाकरीचे ताट म्हणजे स्वर्ग म्हणावा अस काही. 

तसेच यामध्ये आपण ज्वारीचे पीक कोणत्या प्रकारे घेतो त्यावरूनही हुरड्याची चव बदलत जाते. जसे की गुळभेंडी,  मालदांडी, लालबोंडी, पिवळी असे ज्वारीचे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये गुळभेंडी चवीने छान लागते. तसे बाकीचेही प्रकार खायला सुंदर लागतात पण चवीत फरक जाणवतो. हुरडा एक दीड किंवा दोन दोन महिने देखील खायला योग्य असतात. पण एकदा कणसे पिवळी पडू लागली की मग त्याचा हुरडा होत नाही. ते पूर्ण पिकलेले ज्वारीचे पीक होते. 



अशा या हुरडा पार्टी निमित्ताने दर वर्षी रानात जाऊन जेवणाचे बेत नक्की ठरतात. त्यानिमित्त कित्येक मित्रांना पुन्हा भेटण्याचे कारण मिळते, घरच्यांसोबत मज्जा मस्ती करता येते, सर्वांसोबत गप्पा टप्पा करत आणि हातातला तो हुरडा चवीने खात रहावा एवढेच वाटत राहते. 

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...