मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ फेब्रुवारी || Dinvishesh 27 February ||


जन्म

१. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज , लेखक , कादंबरीकार (१९१२)
२. बी एस युड्युरप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९४३)
३. एलिस हॅमिल्टन, भौतिकशास्त्रज्ञ (१८६९)
४. स्वेईंन भोर्णसून, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१८८१)
५. ज्योत्स्ना देवधर, लेखिका (१९२६)
६. कार्ल श्मिट, रसायनशास्त्रज्ञ (१८९४)
७. मायकेल ए बर्स्टिन, अमेरीकन लेखक (१९७०)
८. प्रकाश झा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५२)
९. ल्हित्सेन ब्रूवर्स, डच गणितज्ञ (१८८१)
१०. बर्नार्ड एफ ल्योट, फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ (१८९७)

मृत्यु

१. चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक ( १९३१)
२. बहादूर शाह, मुघल बादशहा (१७१२)
३. इवान पावलोव, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
४. हेन्र लुईस स्मिथ, भौतिकशास्त्रज्ञ (१९५१)
५. आदी मर्जबान, अभिनेता , दिग्दर्शक (१९८७)
६. नेविल्ले कार्डस, लेखिका (१९७५)
७. पॉल ऑस्वाल्ड अह्नर्ट, जर्मन खगोल अभ्यासक (१९८९)
८. गणेश वासुदेव मावलकर, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकिय नेते (१९५६)
९. जॉर्ज एच हितचींग्ज, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९९८)
१०. टिना स्ट्रोबोस, डच भौतिकशास्त्रज्ञ (२०१२)

घटना

१. पहिले महीलांसाठीचे मासिक "लेडीज मर्क्युरी" नावाने प्रकाशित कऱण्यात आले. (१६९३)
२. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली. (१९००)
३. जे एस हेय यांनी सूर्यापासून रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला. (१९४२)
४. मुस्लिम जमावाने अयोध्येहून परतत असताना गोध्रा येथे हिंदु यात्रेकरूंना रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले. गोध्रा हत्याकांड(२००२)
५. डॉमिनिकाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६७)
६. फ्रान्सने अणुबॉम्ब चाचणी मुरूर्का एटोल येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९७८)
७. कारमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात झाखो उत्तर इराक येथे शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
८. अर्सनिय यत्सेण्युक हे युक्रेनचे पंतप्रधान झाले. (२०१४)

महत्त्व

१. मराठी भाषा दिवस, कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस हा दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...