मुख्य सामग्रीवर वगळा

सुरुवात || Manatle Vichar || Marathi Blog ||



 खुप दिवस असे निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत. असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायमच साथ दिली. जे आजची तुझ्या एका हाकेवर आत्ता तुझ्यासाठी धावून आले. कशासाठी ?? तुझ्या मनातलं सार काही व्यक्त करण्यासाठी ?? हो ना ?? मग का राहावं त्या शब्दांपासून दूर कोणा अनोळखी लोकांमुळे ?? ते शब्द आजही सोबत आहेत , फक्त त्यातली ती व्यक्ती हरवून गेली. खरंच !! कुठे हरवून गेली आणि कुठे बदलून गेली. पण मग शब्दांनीच प्रतिप्रश्न केला, आमची ओळख त्या अनोळखी चेहऱ्यात आहे ?? तू म्हणून आमची काहीच ओळख नाही ?? सांग ना !! मी त्या क्षणी निरुत्तर झालो. 

 ठरवून असं काहीच होत नाही. आणि नशीबा पुढे काहीच मिळत नाही. म्हणून तेव्हाच ठरवलं आता स्वतःसाठी लिहायचं. शब्दांच्या दुनियेत आपण आता स्वतः ला पहायचं. आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची. शब्दांना पुन्हा नव्याने बोलायला लावायच. इतकं की शब्दही पुन्हा नव्याने मला मनसोक्त बोलतील. कसं असतं ना !! आपण शेवटी कितीही चेहरे पाहिले तरी आपल्याला आपल्या चेहऱ्याची ओढ ती काही वेगळीच वाटते. तसच काहीस माझं आता झालंय. नेहमी शब्दांच्या दुनियेत अनोळखी चेहरे मी खूप व्यक्त केले आणि एक चेहरा तो नेहमीच राहून गेला, आणि तो म्हणजे स्वतःचा !! पण अलगद या चेहऱ्याला आता मला रंगवायचं आहे. कित्येक भाव मला माझ्या शब्दात मांडायचे आहेत. कित्येक कविता लिहायच्या आहेत ज्यांना शब्दात मला गुंफायच आहे. ना कोणा वाचकाची वाट पाहणे ना कोणा अनोळखी चेहऱ्याची ओढ ! ओढ ती फक्त स्वतःची स्वतःसाठी !! 

आजपर्यंत नात्यांना मी माझ्या शब्दात लिहिलं. रागाला त्या भावनेत व्यक्त केलं, त्या प्रेमाला मी कवितेत मांडलं. पण हे सगळं झालं ते अनोळखी चेहऱसाठी त्यात मी कुठे होतो ?? मलाच माहीत नाही. पण मग आता मी शोधू तरी कुठे स्वतः ला!!  आजही प्रश्न पडतो आणि उत्तरही मिळत. अंतर्मनात!! त्या खोल मनात मी मलाच कुठेतरी दडचून ठेवलंय. ज्याला वर यायचं आहे. मुक्त फिरायच आहे. त्याला शब्दात व्यक्त व्हायचं आहे. त्याला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे. मला पुन्हा लिहायचं आहे !! हो मला पुन्हा लिहायचं आहे !! स्वतःसाठी !!!

✍️ योगेश 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...