मुख्य सामग्रीवर वगळा

बाप्पा निघाले गावाला || Ganpati Bappa Moraya || Marathi Lekh ||


 बाप्पाच्या आगमना वेळी खरतर बाप्पा पुन्हा जाऊच नये अस नेहमी वाटत राहतं. पण अनंत चतुर्थी येते आणि वरद विनायकाची जायची वेळ येते. मनातल्या भावनांना आवरत गजाननाची निरोपाची तयारी करावी लागते. हो पण बाप्पाच्या विसर्जनाला मस्त मिरवणूक काढली जाते. ढोल ताशा, लेझिम, कुठे डिजे , कुठे भक्तिपर गाणी यांनी हा आसमंत दुमदुमून जातो. "पुढच्या वर्षी लवकर या!!" ही बाप्पाला दिलेली साद वक्रतुंड नक्की ऐकतो. आणि सुरू होते बाप्पाला निरोपाची वेळ. मनात एक सल असते पण तिथेच एक पुन्हा लवकर येण्याची ओढ असते. या द्विधा मनस्थितीत बाप्पा आपल्या पुढच्या प्रवासाला जात. जिथे पुढच्या वर्षी लवकर त्याला पुन्हा परतून यायचं आहे.




बाप्पाला निरोप देताना खरतर लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्व लोकांची अवस्था एकच असते. कोणाच्या डोळ्यात पाणी येते तर कोणी अलगद आपले टिपूस गाळतो अगदी कोणी पाहणार नाही याची दक्षता घेत. आणि ज्या उत्साहात बाप्पाला घरी आणले होते त्याच उत्साहात त्याला निरोप दिला जातो. जाता जाता बाप्पा खूप काही सांगून जातो. पुढच्या वर्षी येई पर्यंत त्याची आठवण रहावी असे करून जातो. आणि जाताना गणाधीश भक्ताला सांगतो आहे की,

१.मी पुन्हा येईपर्यंत तू नक्कीच आपल्या चांगल्या सवयी वाढवण्याचा प्रयत्न करशील.
२.तुझ्या प्रत्येक आठवणीत माझ्या आठवणी तू जपशील.
३. कधीच वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न तू करणार नाही.
४. सत्कर्म ही मला दिलेली खूप मोठी भेट असेल, तेव्हा पुढच्या वेळी येईल!! तेव्हा नक्कीच तू मला अशा खूप सुंदर गोष्टी देशील.
५. माणूस हा कर्म करतो आणि त्याच फळ त्याला नेहमी भेटतं हे कधी विसरु नकोस.
६. मी जरी परत चाललो असेल तरी माझे लंबकर्न तुझी प्रत्येक साद नक्कीच ऐकणार हे लक्षात ठेव.
७. तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील.
८. मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल.
९. पुढच्या वर्षी मी लवकर येईल !!
१०. आणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं !!

अस जणू सांगून बाप्पा आता निघाले आपल्या गावाला, त्यांच्या येण्याची वाट नक्कीच पाहत राहू पण त्यांनी सांगितलेले मार्ग यावर नक्की चालू. आणि त्या वर्षभर तिथेच त्या आठवणीत बाप्पाला जपू. 

गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी लवकर या !!

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...