मुख्य सामग्रीवर वगळा

द्वंद्व || कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||



 कथा भाग ३

 विशालच्या खोलीतून बाहेर येताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जणू ते तिला खूप काही बोलत होते. रात्रभर ती अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिली. विशाल आणि त्याच्या या वागण्याबद्दल तिच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.तिच्या मनात सदाचे ते वाक्य सारखे घुमू लागले.

"बाईसाहेब !! विशाल दादांना आपण वैद्यबुवांना दाखवू या ??" पण क्षणात आई भानावर येत होती. तिला विशालचे हे वागणे आता विचित्र वाटायला लागले होते.

"जी आता अस्तित्वात नाही तीच नसणं अमान्य करणं, याला काय म्हणावं तेच कळतं नाही. का ती फक्त आपणच आपल्याशी केलेली फसवणूक आहे ?? माहित नाही !! पण याची नक्कीच किंमत आपल्याला मोजावी लागते, हो ना?? विशालच्या बाबतीत ती किंमत कदाचित सायली तर नसेल ना ?? तीच आता त्याला या भूतकाळाच्या जाळ्यातून बाहेर काढू शकेल !! तीच नितांत प्रेम आहे विशालवर !!" 

विचारांच्या तंद्रीत सकाळ केव्हा झाली कळलच नाही. खुर्चीवर विचार करत करत झोपी गेलेल्या आईकडे पाहून सदाने आईला जाग करण्यासाठी हाक मारली.

"बाईसाहेब !! बाईसाहेब !!" 
झोपितून जागे होत, आई समोर उभ्या सदाला पाहू लागली. सदा पुढे बोलू लागला.

"बाईसाहेब !! रात्रभर तुम्ही इथेच झोपलाय होय ?? खोलीत तरी जायचं !!!"
"नाहीरे सदा !! बसल्या बसल्या कधी झोप लागली कळलच नाही !!" आई खुर्चीवरून उठत म्हणाली.
"चहा आणू??"सदा आईकडे पाहत म्हणाला.
"हो आन!! मी आवरते तोपर्यंत !! काय रे सदा !! विशाल उठला का रे ???"
"केव्हाच उठून बसले आहेत दादा !! आवरून पण झालं !! कुठ बाहेर जायच्या तयारीत आहेत वाटत!!"
"नेहमीचच रे ! पायलला आणायला जायचा हट्ट !! दुसरं काय !!" आई आपल्या खोली जात म्हणाली.

इकडे विशाल आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मध्येच सदाला हाक मारत होता.
"ये सदा ! इकडे ये रे !चहा घेऊन ये !"

लांबुनच सदा येतो म्हणून विशालला सांगत होता. तेवढ्यात मुख्य दरवाज्यातून सायली आत येत होती. सदा तिला पाहून म्हणाला.

"अरे !सायली !! ये न !! "
"सर आहेत ??"
"हो आहेत !! खोलीत आहेत !!"
"चहा मी घेऊन जाऊ !" सदाच्या हातातला चहा पाहून सायली म्हणते.
"ठीक आहे !!" सदा चहाचा कप हातात देत म्हणाला.

सायली चहा घेऊन खोलीत येते. विशाल समोर उभा असतो. तिला पाहून विशाल म्हणतो.
"सायली तू !! आणि आता ???" 
"आज वर्ग आहेत सर !!" चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली.
"हो मग एकटीच ??"  विशाल चहा पित म्हणाला.
"बाकीचे आज सगळे फिरायला गेले आहेत !! म्हणून मग एकटीच आले आज !!"
"चला बर झाल!! मलाही आता वेळ नाहीये !! आपण मी आल्यावर वर्ग सुरू करूयात !!" विशाल चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला.
"मला आहे ना वेळ !!" सायली अगदिक होत म्हणाली.
"हो पण मला नाहीये  !!" विशाल एकदम बोलून गेला.

सायली क्षणभर शांत राहिली काहीच बोलली नाही. विशालच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. विशाल लगबगीने बाहेर जाऊन लागला आणि अचानक समोरच्या खुर्चीला अडकून पडणार तेवढ्यात, सायलीने त्याला सावरलं. तो तिच्या मिठीत केव्हा गेला त्यालाही कळलं नाही. तो स्पर्श तिच्या हातांचा त्याच्या हातावर जाणवू लागला होता. ती नजर त्या नजरेत हरवून गेली होती. सायली ही स्वतःला सांभाळू शकत नव्हती. कित्येक वेळ ते एकमेकांत हरवू गेले होते आणि नकळत ओठ ओठांवर स्पर्श करून गेले. तो स्पर्श खूप काही बोलत होता. सायली आणि विशाल आता एक झाले होते. आता विशालच्या त्या मिठीत सायली हरवून गेली, फक्त विशालची राहिली. विशाल बेधुंद होऊन तिच्या ओठांवर नकळत प्रेमाचे कित्येक गोड क्षण रिते करत होता. त्या सुखाच्या परमोच्च क्षणात कदाचित सायली आणि विशाल आता जणू भान हरपून गेले होते. 

विशाल सायलीला घट्ट मिठीत घेऊन होता.
"माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे पायल !! मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत !! "
 विशालच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. सायली क्षणात भानावर आली. स्वतःला विशाल पासून दूर करत सावरू लागली.
"पायल !! माझी पायल !! तू आलीस !!" विशाल बोलत होता.
सायली फक्त पाहत राहिली. आता विशालही भानावर आला. त्याला काय झाले हे कळायच्या आत, सायली खोलीतून बाहेर निघून गेली.

दरवाज्यातून बाहेर जात अश्रू पुसत ती निघून जाऊ लागली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. विशालही झाल्या प्रकारात स्वतःला शोधत होता.

"ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तो आज मला मिठीत घेताना खरंच किती आनंद झाला होता. ते सुख आयुष्यातील इतर सुखापेक्षा खूप सुंदर होत. पण त्या सुखात फक्त मी होते !! तो कुठेच नव्हता. तो होता फक्त शरीराने माझ्याजवळ!! पण मनाने तो आजही त्या पायलचां होता. मग मी त्याला उगाच का शोधत आहे??  मलाच कळतं नाहीये !! आजपर्यंत नितांत प्रेम केलं मी त्याच्यावर !! आज त्याच्या मिठीत असताना फक्त एकदा त्याच्या तोंडून माझं नाव यावं एवढंच वाटत होत मला, होना !!पण तीही इच्छा पूर्ण झाली नाही माझी!! कदाचित विशाल ही आजची आपली शेवटची भेट !! " सायली विचाराच्या वादळात होती.

"आज मला हे काय झालं मलाच कळलं नाही !! ज्या सायलीला मी कधीही त्या नजरेने पाहिल नाही !! ती सायली आज माझ्या मिठीत होती. पण मी कुठे होतो. पायलच्या विश्वात मी हरवून गेलो होतो. काय वाटलं असेल सायलीला !! काय विचार करत असेल ती आता !माझी खूप मोठी चूक झाली!! ! नक्कीच !!" विशाल खुर्चीवर बसून विचारात गुंग होता.

आई कित्येक वेळ विशालची वाट पाहत होती. तिला मनातुन भीतीने ग्रासले होते. जेव्हा विशाल पायलला आणायला निघेल तेव्हा काय म्हणून मी त्याला आडवणार आहे माहीत नाही. पण दिवस मावळतीला आला तरी विशाल आपल्या खोलीतून बाहेर आलाच नाही. आईला आश्चर्य वाटत होत. ती न राहवून विशालच्या खोलीत गेली.

"विशाल !! ये विशाल !! "
स्वतःला सावरत विशाल खूर्चीवरून उठला आणि म्हणाला.
"हा आई !! ये ना !! "
"आज खोलीतून बाहेरच आला नाहीस??"
"हो ते जरा !! चित्र काढण्यात व्यस्त होतो.!!" विशाल तुटक बोलत होता.
"का रे काही झालं का??" आई म्हणाली.
"नाही ग आई !! मी ठीक आहे !!"
"बर बर !!" 

आई एवढेच बोलून खोलीतून बाहेर आली. रात्री जेवतानाही विशालच लक्ष नव्हतं हे तिने ओळखलं होतं. पण कसे विचारावे म्हणून ती शांतच राहिली. जेवण करून विशाल पलंगावर पडून राहिला. कित्येक वेळ विचार करत राहिला. 

विचार करता करता त्याला झोप कधी लागली हे त्यालाही कळल नव्हतं.

"थांब !! जाऊ नकोस !! थांब जाऊ नकोस !!! माझ्यापासून अस लांब जाऊ नकोस !! थांब !! तो जाणारा प्रत्येक पाऊल मला पुन्हा अंधारात घेऊन जाईल !! हे द्वंद्व मला पुरते हैराण करून सोडते आहे !! तुझा हात हाती दे माझ्या !! तुझा हात असाच राहू दे आता !!! सायली !!! या द्वंद्वा मधून सोडवं मला !! थांब सायली जाऊ नकोस !!!"

विशाल अचानक झोपेतून जागा झाला. 


क्रमशः 

✍️योगेश 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...