मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||




टीप :"दृष्टी " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

"त्या डोंगराच्या पलीकडे सूर्य आता हळूहळू मावळतो आहे आणि त्या तिथे पलीकडे छोट्या टेकडीवर इवले इवले दिवे दिसत आहेत. बहुतेक तिथे छोटी वाडी असावी. आणि हे काय !! आकाशात तर पक्ष्याचे थवेच्या थवे जात आहेत!! बहुतेक घराकडे जाण्याची ओढ लागली असावी. ही सांज असतेच तितकी सुंदर!! आपल्या लोकांच्या सहवासात असावं !! अशी ओढचं लावते ती !! त्या दूर पायवाटेवर खाली कोणी शेतकरी आपले गाय वासरू घराकडे घेऊन जात आहेत !! आणि गंमत म्हणजे तो निवांत पुढे चालतोय आणि ते गाय वासरू मनाने त्याच्या मागे येतायत !! मुक्या जनावरांना सुद्धा माया, प्रेम कळतं !! " क्षितिज बोलता बोलता थांबला. 

त्याला ऐकणारी दृष्टी क्षणभर शांत बसली आणि म्हणाली.

"थांबलास का सांग ना मला !! अजुन कशी आहे ही संध्याकाळ ?? त्या बुडणाऱ्या सूर्याचा रंग कसा आहे?? सांग ना ?? त्या पक्ष्यांना क्षणभर थांबायला सांग ना !! मला ना मनमोकळ बोलायचं आहे त्यांना !! क्षितिज !! बोल ना रे !!" दृष्टी उत्सुकतेने बोलू लागली होती.

क्षितिज तिचा हात हातात घेत तिला बोलू लागला.
" ही संध्याकाळ तुझ्या इतकीच सुंदर आहे दृष्टी !! " 
दृष्टी गालातल्या गालात हसते आणि म्हणते.
"पण ही संध्याकाळ रंगांची उधळण करते क्षितिज !! मला तर रंग काय तोही माहीत नाही !! या नजरेला ती संध्याकाळ दिसतच नाही !!" दृष्टी उदास होत म्हणते.
"माझ्या नजरेतून तूही पहाते आहेस ना ?" क्षितिज तिच्या जवळ जात म्हणत होता.
"पण??" दृष्टी मध्येच म्हणाली.
"आता पण नाही आणि काही नाही !! क्षितिज जागेवरून उठत म्हणाला. 

संध्याकाळ सरून आता रात्र झाली होती. दृष्टीला घेऊन क्षितिज आता परतीच्या वाटेवर निघाला होता. जाता जाता तिला तिच्या आश्रमात सोडायचे होते, या विचाराने त्याच्या मनात नुसता गोंधळ घातला होता. न राहवून तो म्हणाला.
"तुला मी किती वेळा सांगितलय दृष्टी की तू त्या आश्रमात राहू नकोस म्हणून !! माझा एक फ्लॅट बंदच आहे!! तिकडे राहा म्हणून !! "
"मी तरी तुला किती वेळा सांगितलं क्षितिज की मी नाही राहू शकत रे!!  मला जस कळायला लागलं तेव्हापासून मी तिथे, त्या आश्रमात राहते आहे !! तिथं माझी जिवाभावाची माणसं आहेत !! माझी एक बहिणही तिथेच आहे !तीही माझ्यासारखी अनाथ आहे!!  तिला सोडून कस येऊ मी तिकडे ??"
"पण मला तू तिथे राहणं आवडत नाही !! "
"कधी आलास तर कळेल तुला !! की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेम करणारी माणसं असतात तरी कशी !! "
"येऊ तरी कसा !! तुमची ती केअर टेकर मला नुसतं खाऊ की गिळू अस पाहत असते !! " क्षितिज अगदी रागात येत म्हणतो.
दृष्टी क्षितिजच्या बोलण्यावर हसते. आणि बोलते.
"कोण मालती ताई !! अरे मनाने खूप चांगल्या आहेत त्या !! "
"अस तुला वाटत !! "
"अरे नाही खरंच !! एकदा भेट तू त्यांना म्हणजे कळेल !! "
"भेटायला कश्याला हवं समोरच आहेत त्या !!"
"म्हणजे ?? " दृष्टी प्रश्नार्थक चेहरा करत विचारते.
"म्हणजे आपण पोहचलो ! आला आश्रम !!"

क्षितिज दृष्टीला कार मधून उतरायला मदत करू लागला. समोर दृष्टीची अनाथ बहीण भावना तिला पाहताच लगेच तिला घ्यायला जवळ आली. क्षितिजकडे पाहून ती हसली. दोघीही आत आश्रमात जाऊ लागल्या. क्षितिज दृष्टी आत जाई पर्यंत तिला पाहत राहिला. 

दृष्टी आत येताच मालती ताई समोरच होत्या. तिला पाहून त्या बोलू लागल्या.
"दृष्टी!! "
आवाजाने दृष्टी चपापली. 
"कोण ?? मालती ताई ??"
"हो मीच !! "
"बोला ना ताई !!"
"कुठे गेली होतीस दृष्टी ??"
"सूर्यास्त पहायला !!" दृष्टी म्हणाली.
"तू पाहिलास ??" मालती ताई तिला जवळच्या खुर्चीवर बसवत म्हणाल्या.
"हो !! पाहिला मी सूर्यास्त !! क्षितिजच्या नजरेतून !! " 
"छान !! हे सगळं ठीक आहे दृष्टी !! पण तू हे विसरू नकोस की तू एक अंध अनाथ मुलगी आहेस ! आणि क्षितिज एक सुंदर देखणा श्रीमंत घरातला मुलगा आहे !!" 
"पण क्षितिज माझ्यावर प्रेम करतो !!"
"हे वय असतच अस पोरी !! तुम्ही दोघंही तरुण आहात !! तूही सुंदर आहेस !! उद्या काही अनुचित घडू नये म्हणून तुझी काळजी वाटते!!" मालती ताई दृष्टीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या.
"माझा क्षितिज असा नाही !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !!"
"मलाही असंच हवं आहे मुली !! तुझ्या या अश्या असण्यामुळे आधीच तू खूप काही भोगलं आहेस !! तुझं भविष्य सुंदर व्हावं एवढंच वाटत मला ! "

दृष्टी नकळत मालती ताईला मिठी मारते. मालती ताई भावनाला तिच्या खोलीत घेऊन जायला सांगते. जवळ उभी भावना तिला उठवत म्हणते
"चल दृष्टी ताई !!"
 हातातली काठी बाजूला ठेवून दृष्टी खोलीत जायला निघते. तेव्हा शेजारीच उभ्या काही मुली उगाच तिच्याकडे पाहून हसतात. भावना त्यांच्याकडे रागाने पाहत खोलीत जाते. दृष्टीला पलंगावर बसवून ती बाहेर निघून जाते. पलंगावर बसलेल्या दृष्टीच्या कानात मालती ताईचे ते शब्द घुमू लागतात.

"तू एक गरीब अनाथ अंध मुलगी आहेस !! आणि तो श्रीमंत घरातला मुलगा!!"

"माझा क्षितिज असा नाहीये !! हो मला माहितीये !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !! मी अनाथ अंध मुलगी असूनही त्यानं माझ्यावर नितांत प्रेम केलं !! हे पुरेस नाही का ?? माझा क्षितिज , या आंधळ्या मुलीला जग दाखवणारा !! तिची क्षणोक्षणी दृष्टी होणारा !! मला क्षणात सोडून जाणार नाही !! नाही !! नाही !!" अचानक दृष्टी बैचेन झाली आणि तितक्यात तिच्या पर्स मधून मोबाईल फोनची रिंग वाजली. ती भानावर येतं चाचपडत चाचपडत फोन शोधते. क्षणभर शोधल्यावर फोन सापडतो.

फोन उचलत ती बोलू लागते.

"हॅलो!! कोण बोलतंय ??"

"क्षितिज बोलतोय !!!" पलीकडून आवाज ऐकू येतो.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...