कधी तरी || एकांत मराठी कविता ||


"थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं !!
कधी जुन्या अडगळीत
उगाच रमून जाणं !!

धुळीत पडलेल्या त्या फोटोला
अलगद पुसून घेणं!!
थोड तरी हवं त्या क्षणाना
पुन्हा मागे घेऊन जाणं!!

जीर्ण झालेल्या त्या पत्रात
पुसटस आपलं नाव शोधणं!!
थोड तरी त्या शब्दातले तेव्हा
भाव डोळ्यात या दिसणं!!

तुटलेल्या त्या खेळण्यात
बालपण आपलं पाहणं!!
थोड तरी हवं या वयाला
पुन्हा लहान होऊन जाण!!

पाहता पाहता आठवणींचे
कित्येक गाव फिरून येणं!!
थोड तरी हवं पण तेव्हा
उगाच रस्ता ते विसरण!!

कधी कळत, कधी नकळत
सारं काही मनातलं सांगणं!!
थोड तरी हवं या अडगळीत
उगाच स्वतःला शोधणं..!!

थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं ..!!"

✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...