मुख्य सामग्रीवर वगळा

मी आणि माझी आई || सुंदर लेख मराठी ||

" बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. "


    अगदी सहज सुचलेल्या काही ओळी आईला वाचून दाखवल्या आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी आल. 'मी फक्त तुला प्रेम देत राहिले , पण त्या प्रेमाची सुंदर वाख्या तू केलीस हे पाहून खूप बरं वाटलं !!' अस आई म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेली. थोड्या वेळाने जेवायला गेलो तेव्हा ताटात माझ्या आवडीच आम्रखंड होत. मी विचारलं, ' आई आज काय विशेष आम्रखंड  केलंस ते??' तर आई म्हणते कशी , ' असच केलं रे !! अगदी सहजच !! ' पण तिच्या गालातल्या त्या स्मितहास्याने मला सगळं काही सांगितलं. तिच्यासाठी लिहिलेल्या त्या चार ओळी तिला इतक्या आवडल्या की तिने त्याबद्दल मला आम्रखंड दिलं. अगदी मनसोक्त खाल्ल्यावर मी पुन्हा वाचत बसलो.

   कित्येक वेळ पुस्तकाची पाने चाळत असताना अचानक थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग मनात घोळू लागला. मी चार ओळी आईसाठी लिहिल्या, अगदी सहजच. तर तिने मला लगेच माझ्या आवडीचे दिले. मग त्या आईने तर आपल्याला आजपर्यंत किती दिले आणि अजूनही देतच आहे. मग आपण त्या आईचे किती देणे लागतो. केला हिशोब . अगदी आठवून आठवून केला.  आणि सहज तोंडातून शब्द निघाले ' आई!! तुझ्या प्रेमाचे ऋण फिटता फिटत नाही !! सारे आयुष्य खर्ची केले तरी तुझे प्रेम संपता संपत नाही!!' पुढे काही शब्द पुसटसे ओठांवर येऊन परतून गेले. कारण खिडकीच्या बाहेर झाडावर एक चिमणी आपल्या पिलांना घास भरवत असताना दिसली. मी पुस्तक बाजूला ठेवले आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. क्षणभर हरवून गेलो त्या चिमण्यात.  आपल्या चोचीत काहीतरी पकडून आणलं होत तिने आणि पिल आपल्या चोची उघड्या करून आकाशाकडे पाहत होती. चिवचिव करणारी ती पिले त्या घरट्यात खाऊन झाल्यावर आपल्या आईला बिलगुन बसली. कित्येक वेळ मी पहात राहिलो.

  मनात असंख्य विचार माझ्या नेहमीच गोंधळ घालत असतात. पण त्या दिवशी ती चिमणी आणि तिची पिले एवढाच विचार माझ्या मनात घोळत होता. राहून राहून वाटायचं , मला बोलता येत , मला लिहिता येत ,मला व्यक्त करता येत म्हणून मी लिहिलेल्या चार ओळी आईला वाचून दाखवू शकलो. त्यामुळे माझे तोंडही गोड झाले . पण या मुक्या पक्षाचं , प्राण्याचं काय ?? ती पिल आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगत असतील आपल्या भावना ?? कस सांगत असेल वासरू आईचं प्रेम ??? पण मनात विचार आला !! या प्रेमाला, या आई आणि पिलाच्या नात्याला!! खरंच शब्दांची गरज आहे ??नाही ना ?? मग कशी होतात व्यक्त हे मुकी जनावरे ?? असंख्य विचार , नुसते शब्द, शब्द आणि शब्द एवढंच असतं का प्रेम ?? तर नाही !! आपल्याला बोलता येत पण त्यांना नाही, पण तरीही ती पिले आईला आपलं प्रेम व्यक्त करतात. तिच्या पंखाच्या सावलीत ,वादळात तिच्यावर विश्वास ठेवतात. ती नक्की आपल्याला चिऊचा घास घेऊन येईल या आशेवर आपल्या आईची वाट पहात बसतात. खरंय मुके पक्षीही आपलं प्रेम आईला अगदी त्यांच्या भाषेत सांगतात. आपल्या मऊ स्पर्शाने सांगतात.

  वेळ येताच आई आपली मार्गदर्शक होते. वेळ येताच आपण कुठे चुकलो तर आपल्याला योग्य सल्ला देते !! आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा जिद्दीने उभ राहायला बळही देते !! आई आयुष्याचं सार्थक करते !! समोरच्या त्या घरट्यात ती चिमणी पिलांना आकाशात झेप कशी घ्यावी ते कदाचित शिकवत होती. मी मात्र त्यांच्या भावना माझ्या शब्दात समजून घेत होतो. कदाचित प्रत्येक आई आपल्या पिलाला , बाळाला?? मुलाला?? सगळे सारखेच !! नाही का ?? हेच सांगत असणार . शिकावं कस !! जगाव कस ! मग ते शब्दात असो की कृत्यातून !! माणूस असो की पक्षी, आई ही शेवटी आईचं असते. तीचं प्रेम कधीचं कमी होत नाही. आपल्या पिल्लांना शिकवताना कित्येक वेळा ती पिल्लं धडपडत होती , चिमणी पुन्हा पुन्हा त्या पिल्लाला सावरून घेत होती. आई !! आयुष्य कसे असावे ते सांगत होती !! अगदी मुक्याने ?? हो !!

  माझ्या लक्षात येण्या अगोदर एक मस्त कॉफीचा कप माझ्या शेजारी खिडकीत ठेवला गेला. मी क्षणभर वळून पाहिले तर ती आई होती !! मला जाताना एवढंच म्हणून गेली ' थंड होण्या आधीच पिऊन घे !! '  मी काहीच बोललो नाही . माझं लक्ष बाहेरच त्या चिमण्या सोबत मुक्त संचार करत होत, ती धडपड पाहत होतं, आपल्याला शोधत होतं. आणि पाहता पाहता साऱ्या चिमण्या आकाशात भुर्र्रर करत उडाल्या. साऱ्या आसमंतात फिरून आल्या. जरा चिवचिवाट जास्तच करत होत्या घरट्यात आल्या तेव्हा. बहुतेक आयुष्याची पहिली झेप आनंदाने साजरी करत असतील. हो ना ?? एक पिल्लू आपल्या आईला बिलगुन बसलं होत. आपलं प्रेम तर व्यक्त नाहीना करत ते ?? कदाचित असेलही !! तो कॉफीचा कप अलगद उचलत मी घरात पाहू लागलो, पाठमोऱ्या आईकडे पाहत राहिलो , ती आपल्या कामात व्यस्त होती आणि माझ्या ओठातून नकळत ओळी बाहेर आल्या .

आई !! तुझ्या प्रेमाचे ऋण, फिटता फिटत नाहीत!!
सारे आयुष्य खर्ची केले तरी, तुझे प्रेम संपता संपत नाही !!
कधी नकळत सांगितले मी , कधी अबोल राहिलो मी !!
आई !! तुझे हे प्रेमरूप, शब्दात सांगता येत नाही !!

आई !! तुझे हे प्रेमरूप,शब्दात सांगता येत नाही !!

©✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...