क्षण मराठी कविता || Marathi Prem Kavita ||



बोलावंसं वाटलं तरी, काय बोलावं?? 
कधीच कळलं नाही !!

समुद्राच्या लाटेने ते मन, नकळत ओल केलं तरी,
मनास ते कधीच कळल नाही !!

सारा भार त्या अश्रूनवर होता ,
पण अश्रूंनी कधीच तक्रार केली नाही !!

गालावर ते ओघळले आणि,
एकांताची आठवणही झाली नाही !!

किनारा तो साथ देताना,
काहीच बोलला नाही!!

लाटेच्या त्या पुन्हा पुन्हा येण्याची,
 त्याने साधी चाहूलही दिली नाही !!

खरंच त्या भरती आणि ओहोटी मध्ये,
एक क्षणही शोधता आला नाही...!!!

✍🏼 योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...