मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध..✍(कथा भाग ५) अंतिम भाग.

"किती गोड क्षण असतात ना !! आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत, आणि त्या व्यक्ती सोबत कित्येक वेळ बोलत बसायला लावणारी ती एक कॉफी !! त्या समुद्रावरील माझे आणि प्रियाचे सोबतीचे क्षण किती सुंदर होते ना !! आणि आता हे काही क्षण !! " सुहास हॉलमध्ये बसून विचार करत होता.
तेवढयात प्रिया कॉफीचा कप घेऊन आली.
"सुहास !! घे कॉफी !! "प्रियाच्या डोळयात वेगळीच चमक दिसत होती.
"बस ना!! " सुहास कॉफीचा कप घेत म्हणाला.
"तुझ्या सोबतचे हे क्षण कधीच विसरणार नाही मी प्रिया !! खरतर सगळं संपलं म्हणून मी हताश झालो होतो!! पण तू अचानक आलीस आणि जगण्याची नवी प्रेरणा मिळाली !! पुन्हा नाहीना मला सोडून जाणार ??" सुहास कित्येक डोळ्यातले भाव बोलत होता.
"नाही !! कधीच नाही !! " प्रिया थोडी तुटक बोलली.
"घेणं !!! तुझ्यासाठी खास बनवली आहे मी कॉफी !! " प्रिया कॉफीचा एक घोट घेत म्हणाली.
"मग तर घ्यायलाच हवी !! " सुहास कॉफी घेत म्हणाला.
"क्या बात है !! तुझ्याच सारखी झाली आहे कॉफी !! एकदम सुंदर !! " सुहास कप बाजुला ठेवत म्हणाला.
"सगळं काही विसरून नव्याने नात सुरू करण्याची मजाच काही वेगळी असते ना !! "
सुहासच्या या बोलण्याला प्रियाने फक्त एक हासू देऊन प्रतिक्रिया दिली.
"विशालच्या नादी लागून  खरंच खूप मोठी चूक केली रे सुहास !!" प्रिया अगदी शांत बोलत होती.
"जाऊदे !! जे होत ते चांगल्यासाठीच होत !! " सुहास थोडा अस्वस्थ होऊ लागला.
"पण यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही सुहास !! " प्रिया त्याच्याकडे पाहून बोलत होती.
"यापुढे ...!!!"सुहास बोलता बोलता थांबला. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची धडपड बघून प्रिया त्याच्या जवळ आली.
"काय होतंय सुहास !! "
"काही नाही !! थोड बैचेन वाटतंय मला !!"
"शांत बस जरा !! बरं वाटेल !! " प्रिया त्याला बसवत म्हणाली.
"नाही !! खूप ... कसतरी होतंय मला...!! चक्कर येते!! प्रिया ....!!!!!" सुहास स्वतःला सावरत होता.
"होणारच ना सुहास !! "प्रिया भेसूर हसत म्हणाली.
सुहास जमिनीवर कोसळला. प्रिया फक्त बघत होती. त्याची मृत्यूशी धपडपड चालली होती.
"तुला कायमच माझ्या आयुष्यातून घालवायला आले होते सुहास मी !! तुझ्या नंतर ही सगळी संपत्ती माझी होणार !!! मी आणि विशाल मजेत राहणार !! तुझ्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नको होती मला सुहास !! मला  माफ कर !! पण तुझ्या जाण्यातच माझं सुख आहे !!" प्रिया मनातलं विष ओकत होती.
सुहास कित्येक वेळ धडपडला. आयुष्याशी अखेर जुंज संपली. विश्वासाची किती मोठी किंमत मोजावी लागली.
"तुला माहितेय !! अखेरच्या क्षणी सुद्धा माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होत प्रिया!! विश्वास होता त्याचा घात केलास तू !! अखेर तुझ्या मागुन विशाल येताना मी पाहिला आणि डोळे मिटले !! अगदी कायमचे !!! " सुहासचां प्रत्येक अखेरचा श्वास त्याला बोलत होता. तो शांत पडला होता.
"आणि अखेर माझ्या या देहाला ती शिक्षा भेटलीच पाहिजे !! त्याला त्या मागच्या अंगणात पुरून टाकलं म्हणे यांनी !! नाही ती शिक्षा त्याला व्हायलाच हवी !! कारण त्याच्यातील मला त्याची शिक्षा मिळते आहे !! सुटका नाहीच ना !! इथेच या घरात आजही मी तसाच आहे !! विश्वास आणि विश्वासघात या दोघांचे भांडण बघत !!   शेवटच्या श्वासानंतर ती मला कधीच दिसली नाही !! विष दिलं मला तिने !! तिला वाटलं माझी सुटका झाली!! पण त्या नंतर या घरात माझ्या शिवाय पुन्हा मला कोणंचं दिसल नाही!! धुळीत पडलेले ते कॉफीचे दोन कप आजही तसेच आहेत !! कोणी त्याला उचलतंही नाही !! कारण कोणी आता इकडे येतही नाही !! "
"मी म्हटलं होत ना ही कथा माझी आहे !! विश्वासाला तडा जाणारी आहे !! खरतर सांगायची नव्हती मला !! पण तरीही मी सांगीतली आहे !! कारण या मृत्यू नंतरच्या या शिक्षेतून मला खरंच सुटका हवी आहे !! कुठे आहे प्रिया !! जिच्यावर मी इतके प्रेम केले !! तिला बोलावून घ्या इकडे आणि मला या एकांताच्या शिक्षेतून सोडवं म्हणून सांगा !! ना मला भूक आहे !! ना मला तहान !! ना मी अस्तित्व आहे !!ना आभास !! हो मी एक झुळूक आहे !! ज्याला ना कुठे जायचे आहे !! ना कुठे थांबायचे आहे.!! "
शेवट माझा अजूनही अपूर्ण आहे ....

*समाप्त*

✍©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...