मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध..✍(कथा भाग ४)

"माझ्या आयुष्यात कधी प्रिया नव्हतीच !!  अस मनाला कितीही सांगितलं, तरी ते तिची आठवण पुन्हा करून देतं ना !! म्हणे मी मधे आलो तिच्या आणि विशालच्या प्रेमात !!  ती एकदा म्हणाली असती तरी मी त्याच्या मध्ये आलो नसतो..!! " सुहास स्वतःशीच बोलत होता. अगदी मनात भांडत होता स्वतःशीच.
तेवढ्याच दरवाजा वाजला. बाहेरून कोणी सुहासला बोलावत होत.
"सुहास !! "
"कोण आहे !! " सुहास दरवाजा उघडत म्हणाला.
"मी आहे प्रिया !! "
सुहासला हे ऐकुन आश्चर्य वाटल्या शिवाय राहील नाही. तो दरवाजा उघडतो तोच प्रिया त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिला सावरत सुहास म्हणाला.
"काय झाल प्रिया !!! "
"सुहास !! खरंचं माझं चुकलं!! मी तुला सोडून जायला नको होत !!" प्रिया रडक्या चेहऱ्याने बोलत होती.
"हो पण झाल काय ???"
"सुहास !! तो खूप वाईट आहे !! त्यानं मला कित्येक स्वप्न दाखवली !! पण सगळी खोटी ठरली!! "
" त्याने तुला काही केलं तर नाही ना ??"  सुहास म्हणाला.
"खूप त्रास दिला मला त्याने !! विशाल खरंचं खूप वाईट आहे सुहास !! आज मला त्याच खरं रूप कळलं!! ते प्रेम खोटं होत !! ते सगळं खोटं होत सुहास !! माझी खरंच खूप मोठी चूक झाली!!! " प्रिया कित्येक अश्रू वाहत बोलत होती.
"आधी तू शांत हो प्रिया !! आत ये !! शांत बस इथे, आणि काय झाल ते नीट सांग !! " सुहास तिला शांत करत म्हणाला.
प्रिया जवळच्या खुर्चीवर बसली. सुहास तिच्या जवळ बसला. तिला शेजारीच ठेवलेल्या पेल्यातल पाणी देत म्हणाला,
"जे झाल ते एक वाईट स्वप्न होत अस समजून आपण विसरून जावूयात प्रिया !! नव्याने सुरुवात करुयात आपल्या नात्याची !! तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही कधी मी अंतर देणार नाही !!प्रेम केलं आहे प्रिया मी तुझ्यावर !! तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत मी तुला साथ देईन याच वचन ही दिलं आहे तुला !! त्या सात फेऱ्यांमध्ये !! सगळं पुन्हा नव्याने सुरुवात करू !!" सुहास प्रियाकडे पाहत बोलत होता. तिला आपलंसं करत होता.
"इतकं सोपं आहे सुहास ??"
"इतकं अवघडही नाही !! " सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मला खरंच काय बोलावं ते कळत नाहीये!!" प्रिया थोडी शांत होत म्हणाली.
"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे प्रिया !! तू करू शकते पुन्हा नव्याने !!"
   प्रिया फक्त सुहासकडे पाहून हसली. पण काही क्षणांपुरतेच. तिच्या हसण्यात कदाचित जुने सारे दुःख लपले होते. त्यानंतर प्रिया आणि सुहास कित्येक अश्रू पुसून आनंदाने राहु लागले. सुहासला सार काही हवंहवंसं वाटू लागलं. त्याच्या मनात प्रिया बद्दल अजून प्रेम वाढू लागलं.
"खरंच सार अचानक बदलून जावं !! आणि वठलेल्या झाडालाही पालवी फुटावी. अस काहीस माझ्या आयुष्यात झालंय !! जे नात संपलं म्हणून मी आसवे गाळत होतो , ते नात नव्याने फुलाव !! खरंच माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही!! सार काही आता मला सुंदर वाटतंय!! होणं !! आपल माणूस आपल्या जवळ असलं की कस सुंदर वाटत ना!! प्रिया!!! माझ जिच्यावर मनापासुन प्रेम आहे ती ,आता माझ्यावरही प्रेम करायला लागली असेल ना!! सार काही स्वप्न तर नाहीना ???" सुहास स्वतःलाच विचारू लागला.

"अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी

सांगून कानात या निघून जावी
अल्लड हसून मज वेड लावी
प्रेम मनातले पाकळ्यात लपवावी
हातात येताच लाजून पहावी

कधीं दिसताच उगाच रुसवी
खोट्या रागास गालावर आणावी
प्रेमात साऱ्या चिंब भिजावी
जणू कळी आयुष्य फुलवून जावी..!!"

होणं !! ही कळी किती सुंदर आहेना !! माझं हे रुक्ष आयुष्य पुन्हा फुलवल या कळीने !!" सुहास गालातल्या गालात हसत मनातच बोलत होता.
  प्रिया पुन्हा आयुष्यात आली म्हणून सुहास खूप आनंदी होता. प्रियाही आता पुन्हा पहिल्या सारखं वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला होणाऱ्या बाळाचा काहीच दोष नव्हता ना?? मग त्याला मारायचं का ?? अस सुहास म्हणाला आणि त्याने प्रियाची आणि त्या बाळाची काळजी घ्यायची ठरवल.
"प्रिया !! " सुहास तिला बोलावत होता.
"काय रे सुहास !! "प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"बाहेर येतेस माझ्या सोबत ??"
"हो चल ना !! "
प्रिया आणि सुहास दोघेही समुद्र किनारी फिरायला गेले. सार काही चांगलं चालू होत. कित्येक वेळ मजा मस्ती करून दोघेही घरी आले.
"तू बस !! अस अवघडल्या अवस्थेत जास्त त्रास करून घ्यायचा नसतो प्रिया !! "
"अरे पण आपल्या दोघांना मस्त कॉफी करते ना मी ??"
"नाही मी करतो !! तू बस !!" सुहास आग्रह करू लागला.
"अजिबात नाही !! कॉफी तर तुला माझ्याच हातची देणार मी !!" प्रिया जागेवरून उठतं म्हणाली.
"नाही !!" सुहास तिला अडवत होता. पण प्रिया काहीच न ऐकता तडक स्वयंपाक घरात गेली .

क्रमशः ..

✍©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi lekh ||

दरवर्षी वाढदिवस येतो आणि कित्येक आठवणी देऊन जातो. त्याची सुरूवात नवे वर्ष सुरू झाले की आपल्या जन्म दिवशी कोणता वार येतो तिथून केली जाते आणि दरवर्षी हे नक्की होत. हल्ली तर लहान मुलांचे महिन्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात. पण पूर्वी तस काहीच नसायच, जन्म दिलेल्या आईलाही आपलं मूल केव्हा जन्मल हे नीटसं आठवत नसायचं. अगदी लांब कशाला माझ्या आईच तसच काहीस आहे. तिला तिची जन्म तारीख नक्की कधी आहे हेच माहित नाही. आज्जीला विचारलं की आज्जी एवढंच सांगायची की मोठी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुझ्या आईचा जन्म झाला, १९६७ की ६८ ते नीटसं सांगता येत नाही, पण त्यादिवशी मंगळवार होता. बस्स एवढंच ते काय माहिती आईच्या वाढदिवसाबद्दल. मग काय गेली कित्येक वर्ष आईचा वाढदिवस आम्ही द्वादशीला साजरा करू लागलो. पण नक्की तारीख ती काय जाणुन घ्यायची इच्छा मला काही शांत बसू देईना. या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुल...