मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध ..✍(कथा भाग ३)

"भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली. मग हे नात आहे तरी काय ?? खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का ??  त्या मनाच काय?? त्याला खरंच त्या नात्याला सात जन्म टिकवायचं आहे का ?? "  सुहास त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता.
"सुहास !! बाहेर ये !! मला तुला बोलायचं आहे!!" बाहेरून प्रिया सुहासला बोलावू लागली.
कित्येक वेळ प्रिया त्याला बोलावत होती. पण तो आलाच नाही. अखेर कित्येक वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते.
" हा काय वेडेपणा लावलायस तू सुहास !! एवढ काही आकाश कोसळलं नाहीये !!" प्रिया उद्धांपणे सुहासला बोलत होती.
"खरंच म्हणतेयस तू !! एवढ काही झालचं नाही!!" प्रियाच्या डोळयात पाहत सुहास म्हणाला.
" मला वेगळं व्हायचं आहे सुहास !!! मला घटस्फोट हवाय !!" प्रिया शांत बोलत होती.
"ज्या नात्यात काही अर्थ राहिलाच नाही त्याला जपून तरी काय करायचं !! " सुहास प्रियाकडे न पाहताच बोलत होता.
"तेच म्हणायचं आहे मला !! पण ..!!!"
"पण काय ???" सुहास विचारू लागला.
"मी वाईट आहे, असं मनाला कधी वाटून घेऊ नकोस!! मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी!!" प्रिया .
"तू आताही जावू शकतेस प्रिया!!मला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता !!" सुहास डोळ्यातील ओघळणाऱ्या आश्रुला आवरत म्हणाला.
प्रिया काहीच न बोलता निघून गेली. सुहास जागच्या जागी बसून राहिला. सगळं काही आवरून प्रिया घरातून बाहेर पडली, ती थेट गेली विशालकडे.
"विशाल !! विशाल !! "
"कोण आहे ??"
"मी आहे प्रिया !!" प्रिया विशालला पाहताच त्याला मिठी मारतच म्हणाली, विशालाल ती अचानक समोर आली हे पाहून आश्चर्य वाटलं.
"प्रिया !! तू इथे कस काय??"
"मी सुहासला सोडून आले विशाल !! कायमची !! "
"काय वेडेपणा आहे हा ??" विशाल थोडा चिडक्या स्वरात म्हणाला.
"पण आपलं ठरलं होत ना !! मी त्याला सोडून येणार!! आणि आपण एकत्र येणार ते !! "
"हो पण ते आता नाही !!" विशाल तिला लांब करत म्हणाला.
"मग कधी विशाल..!! मला नाही राहायचं तिकडे आता !!!" प्रिया अगदीक होऊन म्हणाली.
"आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुहासला सहन करावचं लागेल प्रिया !!"  विशाल मनातलं बोलला.
प्रिया एकटक विशालकडे पाहत होती.
" किंवा तू परत गेलीस तरी चालेल प्रिया !! माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे !! "  विशाल मनातले कित्येक विषारी विचार बोलत होता.
प्रिया आणि विशाल कित्येक वेळ बोलत बसले. पण सुहास मात्र आता एकटा पडला होता. त्याच्याकडे प्रियाच्या आठवणीं शिवाय काहीचं उरलं नव्हतं. त्या आठवणीतून तो काही गोड क्षण शोधत होता.
   "हा ऐकांत मला किती छळतो पण त्याच ते छळन मला आता हवंहवंसं वाटायला लागलं आहे !! कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार !! खोटी नाती !!! खोटं हासू !! खोटी वचने !! सारं काही खोटं वाटायला लागलं होतं !! पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही !! कारण तिचं अस्तित्व असतं ..!! अगदी कायमचं !! त्या घरात!!! त्या मनात कुठेतरी !!! होना !! प्रिया गेली !! अगदी कायमची सोडून गेली!! जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे !!माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं !! पण ती आनंदी असेल तिच्या जगात, हेच महत्त्वाचं !!
  तो एकांत सुहासला खूप काही बोलू लागला. त्याच्या प्रत्येक क्षणाला विचारू लागला. इतक सार मिळवूनही अखेर तू एकटाच का?? सुहास मात्र शांत बसू लागला. त्या क्षणाला काहीच बोलत नव्हता. कारण क्षण सारे निरर्थक वाटू लागले होते.
आता दिवस आणि रात्र सारे एकच वाटू लागले. सुहास आपल्या कामात व्यस्त होता. मनात काही शब्द होते .. आठवणीतले.

"नात्यास नाही म्हणालो तरी
आठवणी कश्या पुसल्या जाणारा
नाही म्हणून ती वाट टाळली जरी
त्या मनास कोण आवर घालणार

होतील किती रुसवे नी फुगवे
किती काळ मग दूर राहणार
आज नी उद्या पुन्हा त्या घरात
भेट अशी मग त्यासवे होणार

हो !! चिडले ते क्षण काही आज
उद्यास मग ते विसरून जाणार
नको त्या कटू आठवणीं सोबत
गोड हासू तेव्हा त्यात शोधणार

असेच हे नाते जपायचे
अखेर काय हाती उरणार
संपतील हे श्वास जगायचे तेव्हा
सारे काही  इथेच राहणार ..!! "

" अगदी खरं आहे !!! सार काही इथेच राहणार !! " सुहास स्वतः ला पुटपुटला..

क्रमशः

✍©योगेश खजानदार
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...