मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ..✍(कथा भाग २)

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी.
" उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!"  विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
"काय विशाल बेटा , झाली का झोप??" मारिया खोलीत येत म्हणाली.
"हो !! " विशाल शेजारच्या पुस्तकांकडे पाहत म्हणाला.
मारिया आपल्या कामात व्यस्त झाली. विशाल एकटक खिडकीतुन बाहेर पाहत होता. जणू ते सूर्याचं तेज त्याला खूप काही बोलत होतं.
"रोजच कसं प्रसन्न होऊन जगायचं!! आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्यांना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही !! नाही का ??
" विशाल !! विशाल !! " मारिया विशालकडे पाहून बोलू लागली.
विशाल आपल्याच विचारात मग्न होता. मारियाच्या आवाजाने तो भानावर आला.
"काय मारिया !! "
"तुला, चहा हवाय??" विशालच्या होकारार्थी उत्तराने मारिया खोलीतून बाहेर निघून गेली.
विशाल आज सकाळपासून पलंगावर होता. मारिया चहा घेऊन आली आणि हातात तिच्या काहीतरी आहे हे विशालने पाहिलं.
"काय आहे ते ??"
"पत्र आहे!! " मारिया चहा विशालकडे देत म्हणाली.
"कोणाचं ??" विशाल कुतूहलाने विचारू लागला.
"प्रिती सरदेसाई!!" मारिया पत्र विशालकडे देत म्हणाली.
विशालला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. या आधी प्रितीच पत्र कधीच आल नव्हतं. आज अचानक तिचं पत्र आलं आणि विशाल निशब्द झाला.
"तूच !! तूच वाच पत्र !! " विशाल मारियाकडे पत्र देत म्हणाला.
मारिया पत्र हातात घेत वाचू लागली.
"नमस्कार निरंजन !! " मारिया विशालकडे पाहू लागली.
"मी निरंजन या नावाने पत्र लिहीत होतो !! " मारिया काहीच न बोलता पुढे वाचू लागली.
"तुमचे कित्येक पत्र मला मिळाली , माझ्या लिखाणावर इतकं प्रेम करणारे कोणी वाचक आहेत ह्याचा मला खरंच खूप आनंद झाला. खूप शोधल्या नंतर मला तुमचा पत्ता मिळाला. तरी माझी एक इच्छा आहे , की मी पुढच्या आठवड्यात तुमच्याच गावी येणार आहे. तरी मला तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे !! माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं !! त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे !! तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच !! तर भेटुयात नक्की !! " मारिया पत्र वाचून शांत झाली.
"मला भेटायचं म्हणते !! नाही .!! मला नाही भेटायचं पण तुला !! " विशाल अचानक अस्वस्थ झाला. खूप काही बोलू लागला.
"मारिया !! कागद आणि पेन घेऊन ये !! मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे !! मारिया जा ना !! घेऊन ये लवकर !!! " विशाल उठण्याची धडपड करू लागला. आणि अचानक पलंगावरून खाली पडला.
खाली पडलेल्या विशालला सावरायला मारिया पुढे आली आणि म्हणू लागली,
"अरे !! येऊ देत ना विशाल !! त्याने काय होणार आहे !! तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ !!"
"नाही मारिया !! ती मला भेटू नये कधी !! ती आली तरी तिला सांग !! मी नाही म्हणून !! "
प्रिती विशालला भेटायला येणार या विचाराने विशाल अस्वस्थ झाला.
"कशाला येणार आहेस मला भेटायला !! निरुपयोगी मला पाहायला !! की अजून स्वतः ला त्रास करून घ्यायला !!! नको प्रिती तुला नाही सहन होणार हे !! मी एक रुबाबदार !! तुझ्यासाठी वाट्टेल ते करणारा विशाल !! असा असाहाय पहायचा आहे का तुला ?? देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत !! हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे !! " विशाल प्रितीच्या त्या पत्रास हातात घेऊन विचार करत होता.
मारिया त्याला कित्येक वेळ समजावत होती.
"मारिया !!आपण एक महिनाभर कुठे निघून जाऊया का ??"
"बेटा !! मी तुला अस काही करू देणार नाही !! "
"पण मला तिला भेटायचं नाहीये !! " विशाल मोठ्या आवाजात बोलत होता.
"तू नकोच भेटू तिला !! एक लक्षात ठेव !! तू कदाचित लपवून ठेवशील तुझं हे दुःख आयुष्यभर तिच्यापासून !! पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल !! " मारिया अगदी मनापासून सांगत होती.
विशाल मारियाच्या या बोलण्याने शांत झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
प्रिती सुधा निरंजला भेटायला अतुर झाली होती. कधी एकदा त्याच्या समोर जाऊन,
"तुला माझ लिखाण इतक आवडत, की तू त्या लिखाणातील माझे भाव कसे काय ओळखू शकतोस ??" हेच जणुकाही तिला विचारायचं होतं.
"आपल्या अगदी जवळच्या कोणीतरी आपल्याशी बोलल्या सारखं का वाटावं. निरंजनच पत्र आलं की ते वाचायची एवढी ती काय उत्सुकता असावी बर मला!!  की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी!! जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला !! खरंच किती वेड असेल ना ते माझ मन !! ते आजही त्याचाच विचार करत !! कुठे असेल?? कसा असेल ?? काही काही माहीत नाही !! माहिती तर एकच !! त्याच प्रेम !! " प्रिती निरंजन ला भेटण्यासाठी आतुर झाली. आपल्याच वहीच्या पानांना खूप काही सांगू लागली.

क्रमशः

©योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...