मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ..! (कथा भाग १)

"आज कित्येक वर्ष निघून गेली !! पण ते बंधन आजही तसच का आहे?? हेच मला कळले नाही !! या पलंगावर पडून कित्येक दिवस असेच गेले !! त्या फिरणाऱ्या गोल चाकांचा काय तो आधार मला !!! पण एवढं सगळं असूनही पुन्हा आजारपणाची भर !! कदाचित त्या देवालाही मला स्वतः कडे बोलावण्याची घाईच झाली आहे !!!" विशाल मनातलं लिहीत होता.
" प्रितीला भेटून कित्येक वर्ष लोटून गेली !! उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात !! तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ' मनाची काहूर !' या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत !! ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत !! तिच्या आजपर्यंतच्या प्रत्येक लिखाणाचं कौतुक केलं मी !! आवर्जून पत्र लिहिली !! पण वेगळ्या नावाने !!! " विशाल लिहिता लिहिता थांबला.
एक अश्रू त्या वहीच्या पानावर पडला आणि कदाचित लिहिण्याच थांबवावं अस विशालला सांगून गेला.
"मारिया !! " जोरात विशाल ओरडत होता.
"मारिया !! " त्या एवढ्या मोठ्या घरात त्याचा आवाज घुमत होता.
लांबून कोणीतरी पळत येतं आहे याचा आवाज झाला. मारिया विशालच्या खोलीत आली आणि बोलु लागली.
"काय पाहिजे विशाल ?" पन्नास साठ वर्षाची ती मारिया एकटक विशालकडे पाहत होती.
"मला बाहेर घेऊन चल !! " विशाल डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता.
"विशाल बेटा , आज पुन्हा प्रितीची आठवण झाली ?" मारिया विशालची नोकर, पण अगदी विशालच्या जवळची होती. कित्येक वर्ष  विशालकडे काम करत होती. अगदी विशालच्या आईसारखी होती.
"नाही मारिया !!अस काही नाहीये !!"
"विशाल बेटा !! किती वर्ष झाली ओळखते मी तुला !! मनातलं असंच मनात ठेवायची सवयच आहे तुला!! " मारिया विशालला एका बाजूने उचलत खुर्चीवर बसवत होती. विशालही तिला आता मनातलं सांगु लागला.
"आज मी पुन्हा प्रितीला पत्र लिहिलं मारिया !! आणि त्यात तिला म्हटलं की कदाचित हे माझं तुला शेवटचं पत्र असेल !! पण अखेर पर्यंत तुझे शब्द माझ्या सोबत राहतील !! " विशाल त्या व्हीलचेअर वर बसून बाहेरच्या मोकळ्या जागेत आला. मारिया शेजारीच बसून होती.
"कसं असतं बघ ना मारिया !! ती प्रिती आजही माझ्यावर किती प्रेम करते !! पण मला तिच्याकडे जायला या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही !! आणि मला माझ्या या परिस्थितीची जाणीवही तिला कधीच करून द्यायची नाही !! "  विशाल समोरच्या बुडत्या सूर्याकडे पाहत म्हणाला.
"पण का ?" मारिया अगदिक होऊन बोलु लागली.
"कारण आपण काही वाईट स्वप्ने कधी पहिलीच नाहीत असं म्हणायचं आणि पुढे जायचं !! मारिया, तिच्या मनात आजही माझ्याबद्दल प्रेम आहे !! मी तिच्यापासून दूर गेलो यात काहीतरी कारण नक्की असणार हे तिलाही माहीत आहे !! पण ते कारण कळू नये असंच मला वाटतं !!" विशाल व्हीलचेअरकडे पाहत म्हणाला.
"पण मला माझ मन सांगत !! ती तुला नक्की शोधत येणार !! " मारिया विशालच्या मागे उभा राहत म्हणाली.
"ती वेळ कधीच येऊ नये असं मला वाटतं !! " विशाल आणि मारिया कित्येक वेळ तिथेच थांबले.
  विशालच्या अपंगत्वाचा तेवढा एकच आधार होता. मारिया !! त्याच्या आयुष्यात बाकी काहीच राहिले नव्हते !! उरल्या होत्या काही आठवणी आपल्याच लोकांच्या!! पण त्याही काहीच दिवस!!
विशाल पुन्हा त्या पलंगावर पडून राहिला. मारिया त्याला तिथे झोपवुन निघुन गेली.
"श्वास कदाचित आता मोजत असतील, शेवटचेच आपले क्षण !! पण मी त्यांना सांगणार आहे !! दोन क्षण थांबा, मला माझ्या प्रितीचा चेहरा शेवटचा एकदा माझ्या नजरेत आणु द्या !! अगदी अखेरचा !! ही विनवणी तुम्हाला !! " विशाल पलंगावर पडून होता. मनात कित्येक विचार होते.
"माझं शरीर जरी पंगू झालं असलं तरी माझ मन प्रितीला रोज भेटत !! कित्येक वेळ ते चालत चालत जात दूर त्या डोंगरात तिच्या सवे !! पाहत बसत मावळती!! आणि तिच्या नजरेतील मी !!मग हळूच घेत तिच्या गालांच चुंबन आणि धावत माझ्याकडे येत !! मन खूपच तिच्यावर प्रेम करत !! " रात्रीच्या त्या एकांताचा वेळी विशाल आपल्या मनाशीच कित्येक वेळ बोलत होता.
ते घड्याळ मात्र सारखं टिक टिक करत होत. विशालला आपल्या स्वतःची जाणीव करून देत होत. ती रात्र  तिच्या आठवणीत किती सुंदर वाटते ना. असे विचारत होत!
"पण प्रिती तुझी साथ आजही आहे !! तुझ्या शब्दांची !!या रात्रीच्या शांततेस भंग करायला तुझ्या कवितेच्या त्या ओळी मला साथ देतात!!

"मज पाहिजे सख्या तुझीच साथ
या आठवांचा मज होतो जाच
नकोस देऊ तू दुरावा मज आता
तोडून बंधने, घे मला कवेत

सांग त्या अंधारास तू काही
नकोस करू क्षणाची घाई
ठेव काही क्षणांस जपून तू
मज आहे तुझ्या भेटीची आस

हो! तू आहेस प्रत्येक श्वासात
माझ्या मनातल्या प्रत्येक घरात
त्या श्वासास ओळख तुझी होताच
उरलास फक्त तू या हृदयात!!! "

अखेर उरलो फक्त मी या एकांतात !!! " विशालचा आवाज साऱ्या घरात घुमला !!

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...