मैत्री✍

हक्काने भांडावं असं
कोणीतरी हवं असतं
हक्काने बोलावं असं
कोणीतरी जवळ लागतं

कोणीतरी अलगद आपल्या
जीवनात तेव्हा येत असतं
मित्र असे त्या नात्यास
नाव ते मग देत असतं

दुःखात आपले अश्रू पुसायला
कायम ते सोबत असत
सुखात मात्र आनंदाने नाचायला
सर्वांच्याही पुढे असतं

एक नात मैत्रीचं हे
आयुष्य सार व्यापून टाकत असतं
कधी पावसात सोबती तर
कधी उन्हात सावली होत असतं

न राहवून आठवणीत
खूप काही बोलत असतं
लांब राहूनही हे नात
सतत साथ तेव्हा देत असतं

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...