भारतीय

  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीतील मुक्त झाला. कित्येक आंदोलने झाली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले याचा आनंद होताच पण  भारताची फाळणी झाली याच दुःखही होत. स्वतंत्र भारतात कित्येक जुनी सस्थाने होती त्यांना एकत्र करणे तितकेच महत्त्वाचे होते. भाषावार प्रांतरचना करून भारत एक देश म्हणून जगासमोर आला.

स्वतंत्र भारता समोर त्यावेळी कित्येक प्रश्न होते. फाळणीचे कित्येक घाव सोसून भारत आता नव्या वाटा पाहू लागला होता. अशाच या भारतचे पुढे सविंधान लिहिले, २६ जानेवारी १९५१ ला या देशाचे प्रजास्तक देश म्हणू नव्याने ओळख झाली.

1962 ला भारत चीन युद्ध सुरू झाले त्यानंतर पुढे 1965 लही भारत पाक उद्धाला सुरुवात झाली. स्वतंत्र भारत त्यावेळी परकीय सत्तेविरूद्ध लढत होता. नंतर 1971 ला भारत पाक पुन्हा युद्ध झाले आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली त्यावेळी पाकिस्तान पुन्हा विभाजित झाला. आणि त्या लढाईत भारत विजयी झाला.

पुढे भारताने काही दिवसात अणुबॉम्ब चाचणी करण्यास सुरुवात केली आणि साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. 1975 77 च्या काळात भारतात आणीबाणी लागू केली गेली.

पुढे जसजशी वर्ष जाऊ लागली तशी भारताची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या जगात सुधारू लागली. भारतचे पहिले satellite "आर्यभट्ट"  आकाशात झेपावले. पुढे slv 3 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे satellite तयार केले गेले. 1998 मधे भारताने यशस्वी रित्या अणुबॉम्ब चाचणी पोकरान येथे केली आणि भारत एक मजबूत देश झाला.

जागतिक दृष्टया भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या नंबर आहे , लोकसंख्येच्या दृष्टीने 2 र्या आणि भारताचे सैन्य ताकद जागतिक दृष्ट्या चौथ्या नंबर वर आहे . आर्थिक दृष्ट्या आज भारताची gdp 7.7 % आहे.

आज भारत technology मध्ये कित्येक पावले पुढे , अंतराळ संशोधन मध्ये भारताची एक वेगळीच छाप आहे , इस्त्रो ही संस्था कित्येक वर्ष यासाठी कार्यरत आहे , भारत आज जगातील व्यापारात पुढे आहे , भारताला एक तृतीयांश भाग समुद्र पट्टी लाभली आहे. ज्याचं जास्त वापर व्यापारी दृष्ट्या केला जातो.

भारत तसा तर संस्कृतींचा देश , इथे कित्येक संस्कृती पाहायला मिळतात, विभिन्न सासंकृती त्याच्या भाषा तसेच त्याचे वेगेल्पण लगेच पाहायला मिळते , हिंदू ,शीख, मुस्लिम तसेच अनेक धर्माच्या संकसृती इथे पाहायला मिळतात. तसेच विभिन्न भाषा मराठी हिंदी , संस्कृत , तमिळ ,गुजराती अशा कित्येक भाषा बोलल्या जातात.

अश्या विविधतेने नटलेल्या देशाबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे . आजच्या काळात भारत जागतिक पातळीवर स्वतःची. एकवेगळी प्रतिमा निर्माण करतो आहे.

सोसले कित्येक घाव फाळणीचे
आजही ती सल मनात आहे
पाहिला सूर्योदय स्वातंत्र्याचा
त्यास नमन करतो आहे

मुक्त श्वास होता मुक्त पावले होती
पण एक होऊन राहायचे आहे
या भारत देशास सरवसावे आज
गीत गायचे आहे

अभिमान , मान , शान देश आपला
त्यास प्रगती पथावर न्यायचे आहे
या जगात भारत देश आपुला
सर्वात पुढे पाहिजे

मिळवले स्वातंत्र्य त्यांनी
आपणास घडवायचे आहे
हा भारत देश प्रिय आपुला
त्यासाठी खूप काही करायचे आहे ...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...