मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय

  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीतील मुक्त झाला. कित्येक आंदोलने झाली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले याचा आनंद होताच पण  भारताची फाळणी झाली याच दुःखही होत. स्वतंत्र भारतात कित्येक जुनी सस्थाने होती त्यांना एकत्र करणे तितकेच महत्त्वाचे होते. भाषावार प्रांतरचना करून भारत एक देश म्हणून जगासमोर आला.

स्वतंत्र भारता समोर त्यावेळी कित्येक प्रश्न होते. फाळणीचे कित्येक घाव सोसून भारत आता नव्या वाटा पाहू लागला होता. अशाच या भारतचे पुढे सविंधान लिहिले, २६ जानेवारी १९५१ ला या देशाचे प्रजास्तक देश म्हणू नव्याने ओळख झाली.

1962 ला भारत चीन युद्ध सुरू झाले त्यानंतर पुढे 1965 लही भारत पाक उद्धाला सुरुवात झाली. स्वतंत्र भारत त्यावेळी परकीय सत्तेविरूद्ध लढत होता. नंतर 1971 ला भारत पाक पुन्हा युद्ध झाले आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली त्यावेळी पाकिस्तान पुन्हा विभाजित झाला. आणि त्या लढाईत भारत विजयी झाला.

पुढे भारताने काही दिवसात अणुबॉम्ब चाचणी करण्यास सुरुवात केली आणि साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. 1975 77 च्या काळात भारतात आणीबाणी लागू केली गेली.

पुढे जसजशी वर्ष जाऊ लागली तशी भारताची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या जगात सुधारू लागली. भारतचे पहिले satellite "आर्यभट्ट"  आकाशात झेपावले. पुढे slv 3 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे satellite तयार केले गेले. 1998 मधे भारताने यशस्वी रित्या अणुबॉम्ब चाचणी पोकरान येथे केली आणि भारत एक मजबूत देश झाला.

जागतिक दृष्टया भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या नंबर आहे , लोकसंख्येच्या दृष्टीने 2 र्या आणि भारताचे सैन्य ताकद जागतिक दृष्ट्या चौथ्या नंबर वर आहे . आर्थिक दृष्ट्या आज भारताची gdp 7.7 % आहे.

आज भारत technology मध्ये कित्येक पावले पुढे , अंतराळ संशोधन मध्ये भारताची एक वेगळीच छाप आहे , इस्त्रो ही संस्था कित्येक वर्ष यासाठी कार्यरत आहे , भारत आज जगातील व्यापारात पुढे आहे , भारताला एक तृतीयांश भाग समुद्र पट्टी लाभली आहे. ज्याचं जास्त वापर व्यापारी दृष्ट्या केला जातो.

भारत तसा तर संस्कृतींचा देश , इथे कित्येक संस्कृती पाहायला मिळतात, विभिन्न सासंकृती त्याच्या भाषा तसेच त्याचे वेगेल्पण लगेच पाहायला मिळते , हिंदू ,शीख, मुस्लिम तसेच अनेक धर्माच्या संकसृती इथे पाहायला मिळतात. तसेच विभिन्न भाषा मराठी हिंदी , संस्कृत , तमिळ ,गुजराती अशा कित्येक भाषा बोलल्या जातात.

अश्या विविधतेने नटलेल्या देशाबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे . आजच्या काळात भारत जागतिक पातळीवर स्वतःची. एकवेगळी प्रतिमा निर्माण करतो आहे.

सोसले कित्येक घाव फाळणीचे
आजही ती सल मनात आहे
पाहिला सूर्योदय स्वातंत्र्याचा
त्यास नमन करतो आहे

मुक्त श्वास होता मुक्त पावले होती
पण एक होऊन राहायचे आहे
या भारत देशास सरवसावे आज
गीत गायचे आहे

अभिमान , मान , शान देश आपला
त्यास प्रगती पथावर न्यायचे आहे
या जगात भारत देश आपुला
सर्वात पुढे पाहिजे

मिळवले स्वातंत्र्य त्यांनी
आपणास घडवायचे आहे
हा भारत देश प्रिय आपुला
त्यासाठी खूप काही करायचे आहे ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...