उठावं ..!✍

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या
कैक मुडदे आजही निपचित आहेत

उगाच ऐकले आवाज ते सत्याचे
आजही ते दगड निर्जीव पडून आहेत

नाही भ्रांत त्यास कशाची आता
आभास त्यास कशाचे होत आहेत

कसली ही आग पेटली त्या मनात
कित्येक स्मशान आज जळत आहेत

हो , उठाव केला आहे मनाने मनाचा
कैक वादळे शांत झाली आहेत

उद्ध्वस्त घरात आजही कोणी का
आपुल्यास पाहून आवाज देत आहेत

कित्येक अपमान सहन केले त्याने
तरीही निर्लज्ज होऊन हसत आहेत

छाताडावर पाय ठेवून बोलता ते
कैक अहंकार जाळून टाकत आहेत

सुटका करण्यास आता उगाच धडपड
पण कालचे ते सुखात नांदत आहेत

कोणता हा बंड केला निरर्थक मनाने
कालचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत

✍योगेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...