मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न ..!! (कथा भाग ६)

"एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हा प्रयत्न !!एक एक ओळ सुंदर व्हावी म्हणून मी तरी किती कागदांच्या पानांना चुरागळून टाकून द्यायचं! आणि हा अट्टाहास फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना!! आज माझ्या लिखाणाचा शेवट माझा मुलगा आज समाज , देश यासाठी काही तरी करतो आहे याने व्हावा यापेक्षा दुसरी स्वप्नपूर्ती ती काय! पण आजही एक स्वप्न अधुरेच राहिले आणि ते कधीच पुरे झाले नाही. दादांच्या समोर मला कित्येक गोष्टी बोलायच्या होत्या. माझ्यातील एका यशस्वी लेखकाची त्याना भेट घडवायची होती. माझ्या उभरत्या काळात, त्याच्या सारखा दुसरा आत्मविश्वास देणारा कोणी नव्हता. आज ती खंत मला सतत बोलते. पण मुलाच्या या कार्याने मन शांत होते!! बघते पुन्हा स्वतःतील कित्येक स्वप्नात जे पूर्ण झाले काही अधुरे राहिले!! पण आयुष्य म्हटलं की काहींना काही सुटनारच ना!! काही स्वप्न पुर्ण होतात काही अधुरी राहतात!! माझ्या यशस्वी लेखकाची एक कादंबरी दादांच्या हाती द्यायचं स्वप्न अखेर आजही अधुरेच राहिले!! माझ्या स्वप्न या माझ्या आत्मचरित्रात हे स्वप्न अधुरेच राहिले!! पण पुरे झाले ते आभाळाला ही आनंदाने बरसायला सांगेन असे माझ्या मुलाचे स्वप्न !! एक बाप म्हणून त्यासारखा आनंद नाही!! "आप्पा लिहीत राहिले

"बरसल्या सरी अगणित वेळा
त्या शांत कराया मातीस
तूही प्रयत्न कर अगणित वेळा
मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस

कडाडली वीज अगणित वेळा
भेटायला त्या मातीस
तूही लख्ख प्रकाशित जा
चालायला त्या स्वप्न पुर्तीस

बरसून जा अगणित वेळा
अधुऱ्या त्या स्वप्नांच्या पूर्तीस ..!! " आप्पा लिखाण करून शांत बसले.
कित्येक वेळ ते लिहिलेल्या त्या ओळी गुणगुणत राहिले.
"आप्पा !! " सुनील बोलावू लागला.
"आलो रे सुनील!!" म्हणत आप्पा बाहेर गेले.
"काय रे !! "आप्पा.
"सकाळ झाली आणि तुम्ही अजुन लिहिताय !! आप्पा रात्रभर झोपला नाहीत ??"
" अरे लिहिण्यात इतका मग्न झालो की लक्षातच नाही आल!!" आप्पा बाहेरच्या अंगणात बघत म्हणाले.
"बरं चला !! आशीर्वाद द्या !! आणि सोबत चला आमच्या !! "सुनील आप्पांना बाहेर घेऊन येत म्हणाला.
"अरे पण कुठे ??" आप्पा विचारू लागले.
"चला तर सांगतो !! " सुनील आप्पांना म्हणाला.
आप्पा आणि मंदा दोघांनाही घेऊन सुनील शाळेकडे चालू लागला. शाळा जवळ येताच सगळेच दिसू लागले. उमा , सारे मित्र , रखमा , सुहास , आजी, चंदा ,तारा आणि बोरुवस्तितल्या बायका आणि मुले , सारे वाटच पाहत थांबले होते.
"काय रे हे सुनील !!" आप्पा आणि मंदा दोघेही विचारू लागले.
"आई !! आप्पा !! या शाळेच्या नव्या स्वप्नाची वाट आता सुरू झाली आहे !! आमच्या सर्वांची इच्छा आहे की आप्पा तुम्ही आज या साऱ्यांना, आम्हाला मार्गदर्शन करावं !! आणि आमच्या नव्या वाटेस बळ द्यावं.!!" उमा म्हणाली.
"अरे पण !! " आप्पा.
"पण नाही आणि काही नाही!! "उमा आणि सारे लोक त्या नव्या शाळेत बसले.
आप्पा साऱ्यां समोर उभा होते. त्यांना बोलायला.
"खरंतर मी काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे !! तुम्ही मुल इतकी हुशार आहात की माझ्या शब्दांनाही कदाचित आज विचार करावा लागेल. स्त्री शिक्षण !! खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही!! माझ्या सारख्या लेखकाला एका स्त्रीने घडवल ती माझी आई !! तिला त्या जुन्या समाजाने शिकू नाही दिल पण तिने घडवलं आमचं घर !! मग स्त्री शिकली तर अजुन किती बदलून जाईल ना सारं हे !! मुलांनाही शिकायला हवं !! पण या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून शिकायला हवं !! धर्म शिक्षणाने कधीच बुडाला नाही !! उलट कोणताही धर्म आपल्याला प्रत्येकाला कसं जगायचं हे शिकवत असतो!! मग कोणता धर्म तुम्ही शिकू नका असे म्हणेन?? " टाळ्यांचा आवाज सगळीकडे झाला.
" मी जास्त काहीच बोलत नाही !! पण मुलगी आणि मुलगा हा भेद विसरून जायला हवा !! तिलाही शिकायचा अधिकार आहे हे नक्की !! या शाळेत तुमच्या भविष्याची स्वप्न कित्येक घडणार आहेत!! त्या स्वप्नांना फक्त तुम्ही रंग भरा !! आयुष्य खूप सुंदर होईल!! " आप्पा आपल बोलणं पूर्ण करून सर्वांना भेटू लागले.
कार्यक्रम आटोपून आप्पा आणि मंदा आता शाळेतून घराकडे जायला निघाले.
"मंदा !! खरंच आज सूनिलचा मला अभिमान वाटतो !!"
"मंद डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली.
"होणं !! खरंच !! स्वतःसाठी कोणीही जगेन !! पण समजासाठी जगणं खरंच खूप वेगळं!!"
आप्पा आणि मंदाला जाताना सुनील आणि उमा पाहू लागले. आत शाळा सुरू झाली. कित्येक मुले शाळेत शिकायला आले.
"उमा !! हे तर स्वप्न पूर्ण झालं !! पण अजुन एक तसंच राहील आहे !! " सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
"कोणते रे ??" उमा चेहऱ्यावर कित्येक भाव बदलत विचारू लागली.
"तुझ्या सोबत सार आयुष्य जगायचं स्वप्न !! ते तू हो म्हणालीस तर पूर्ण होईल !!" सुनील हसत म्हणाला.
उमा थोडा वेळ शांत झाली. सूनिलकडे हसत पाहत म्हणाली.
" माझं ही एक स्वप्न आहे !! आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची !! तू हो म्हणालास तर पूर्ण होईल !! "
उमा असे म्हणताच दोघेही मनसोक्त हसले. एकमेकांकडे पाहत राहिले. मागे शाळेतून आवाज येऊ लागले.
" तर लक्षात असू द्या !! अ अननसाचा !! कशाचा सांगा बरं !! " वर्गातून सुहासचा आवाज येत होता.
"अननसाचा !! " सगळे विद्यार्थी एकदम म्हणाले.

समाप्त

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...