मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न ..!! (कथा भाग ६)

"एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हा प्रयत्न !!एक एक ओळ सुंदर व्हावी म्हणून मी तरी किती कागदांच्या पानांना चुरागळून टाकून द्यायचं! आणि हा अट्टाहास फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना!! आज माझ्या लिखाणाचा शेवट माझा मुलगा आज समाज , देश यासाठी काही तरी करतो आहे याने व्हावा यापेक्षा दुसरी स्वप्नपूर्ती ती काय! पण आजही एक स्वप्न अधुरेच राहिले आणि ते कधीच पुरे झाले नाही. दादांच्या समोर मला कित्येक गोष्टी बोलायच्या होत्या. माझ्यातील एका यशस्वी लेखकाची त्याना भेट घडवायची होती. माझ्या उभरत्या काळात, त्याच्या सारखा दुसरा आत्मविश्वास देणारा कोणी नव्हता. आज ती खंत मला सतत बोलते. पण मुलाच्या या कार्याने मन शांत होते!! बघते पुन्हा स्वतःतील कित्येक स्वप्नात जे पूर्ण झाले काही अधुरे राहिले!! पण आयुष्य म्हटलं की काहींना काही सुटनारच ना!! काही स्वप्न पुर्ण होतात काही अधुरी राहतात!! माझ्या यशस्वी लेखकाची एक कादंबरी दादांच्या हाती द्यायचं स्वप्न अखेर आजही अधुरेच राहिले!! माझ्या स्वप्न या माझ्या आत्मचरित्रात हे स्वप्न अधुरेच राहिले!! पण पुरे झाले ते आभाळाला ही आनंदाने बरसायला सांगेन असे माझ्या मुलाचे स्वप्न !! एक बाप म्हणून त्यासारखा आनंद नाही!! "आप्पा लिहीत राहिले

"बरसल्या सरी अगणित वेळा
त्या शांत कराया मातीस
तूही प्रयत्न कर अगणित वेळा
मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस

कडाडली वीज अगणित वेळा
भेटायला त्या मातीस
तूही लख्ख प्रकाशित जा
चालायला त्या स्वप्न पुर्तीस

बरसून जा अगणित वेळा
अधुऱ्या त्या स्वप्नांच्या पूर्तीस ..!! " आप्पा लिखाण करून शांत बसले.
कित्येक वेळ ते लिहिलेल्या त्या ओळी गुणगुणत राहिले.
"आप्पा !! " सुनील बोलावू लागला.
"आलो रे सुनील!!" म्हणत आप्पा बाहेर गेले.
"काय रे !! "आप्पा.
"सकाळ झाली आणि तुम्ही अजुन लिहिताय !! आप्पा रात्रभर झोपला नाहीत ??"
" अरे लिहिण्यात इतका मग्न झालो की लक्षातच नाही आल!!" आप्पा बाहेरच्या अंगणात बघत म्हणाले.
"बरं चला !! आशीर्वाद द्या !! आणि सोबत चला आमच्या !! "सुनील आप्पांना बाहेर घेऊन येत म्हणाला.
"अरे पण कुठे ??" आप्पा विचारू लागले.
"चला तर सांगतो !! " सुनील आप्पांना म्हणाला.
आप्पा आणि मंदा दोघांनाही घेऊन सुनील शाळेकडे चालू लागला. शाळा जवळ येताच सगळेच दिसू लागले. उमा , सारे मित्र , रखमा , सुहास , आजी, चंदा ,तारा आणि बोरुवस्तितल्या बायका आणि मुले , सारे वाटच पाहत थांबले होते.
"काय रे हे सुनील !!" आप्पा आणि मंदा दोघेही विचारू लागले.
"आई !! आप्पा !! या शाळेच्या नव्या स्वप्नाची वाट आता सुरू झाली आहे !! आमच्या सर्वांची इच्छा आहे की आप्पा तुम्ही आज या साऱ्यांना, आम्हाला मार्गदर्शन करावं !! आणि आमच्या नव्या वाटेस बळ द्यावं.!!" उमा म्हणाली.
"अरे पण !! " आप्पा.
"पण नाही आणि काही नाही!! "उमा आणि सारे लोक त्या नव्या शाळेत बसले.
आप्पा साऱ्यां समोर उभा होते. त्यांना बोलायला.
"खरंतर मी काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे !! तुम्ही मुल इतकी हुशार आहात की माझ्या शब्दांनाही कदाचित आज विचार करावा लागेल. स्त्री शिक्षण !! खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही!! माझ्या सारख्या लेखकाला एका स्त्रीने घडवल ती माझी आई !! तिला त्या जुन्या समाजाने शिकू नाही दिल पण तिने घडवलं आमचं घर !! मग स्त्री शिकली तर अजुन किती बदलून जाईल ना सारं हे !! मुलांनाही शिकायला हवं !! पण या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून शिकायला हवं !! धर्म शिक्षणाने कधीच बुडाला नाही !! उलट कोणताही धर्म आपल्याला प्रत्येकाला कसं जगायचं हे शिकवत असतो!! मग कोणता धर्म तुम्ही शिकू नका असे म्हणेन?? " टाळ्यांचा आवाज सगळीकडे झाला.
" मी जास्त काहीच बोलत नाही !! पण मुलगी आणि मुलगा हा भेद विसरून जायला हवा !! तिलाही शिकायचा अधिकार आहे हे नक्की !! या शाळेत तुमच्या भविष्याची स्वप्न कित्येक घडणार आहेत!! त्या स्वप्नांना फक्त तुम्ही रंग भरा !! आयुष्य खूप सुंदर होईल!! " आप्पा आपल बोलणं पूर्ण करून सर्वांना भेटू लागले.
कार्यक्रम आटोपून आप्पा आणि मंदा आता शाळेतून घराकडे जायला निघाले.
"मंदा !! खरंच आज सूनिलचा मला अभिमान वाटतो !!"
"मंद डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली.
"होणं !! खरंच !! स्वतःसाठी कोणीही जगेन !! पण समजासाठी जगणं खरंच खूप वेगळं!!"
आप्पा आणि मंदाला जाताना सुनील आणि उमा पाहू लागले. आत शाळा सुरू झाली. कित्येक मुले शाळेत शिकायला आले.
"उमा !! हे तर स्वप्न पूर्ण झालं !! पण अजुन एक तसंच राहील आहे !! " सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
"कोणते रे ??" उमा चेहऱ्यावर कित्येक भाव बदलत विचारू लागली.
"तुझ्या सोबत सार आयुष्य जगायचं स्वप्न !! ते तू हो म्हणालीस तर पूर्ण होईल !!" सुनील हसत म्हणाला.
उमा थोडा वेळ शांत झाली. सूनिलकडे हसत पाहत म्हणाली.
" माझं ही एक स्वप्न आहे !! आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची !! तू हो म्हणालास तर पूर्ण होईल !! "
उमा असे म्हणताच दोघेही मनसोक्त हसले. एकमेकांकडे पाहत राहिले. मागे शाळेतून आवाज येऊ लागले.
" तर लक्षात असू द्या !! अ अननसाचा !! कशाचा सांगा बरं !! " वर्गातून सुहासचा आवाज येत होता.
"अननसाचा !! " सगळे विद्यार्थी एकदम म्हणाले.

समाप्त

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...