स्वप्न..(कथा भाग १)

"माझ्यासारखा नतध्रष्ट आणि स्वार्थी माणूस शोधूनही सापडायचा नाही. हो करतात काही लोक माझ्या लिखाणाचं कौतुक !! पण ते सगळं निरर्थक !! तुम्ही म्हणालही कदाचित!!  एवढा मोठा लेखक स्वतः बद्दल हे काय लिहून ठेवतोय. पण जे काही आहे ते खरेच आहे !! दादांच्या जाण्याने या सगळ्या गोष्टी नजरेस पडल्या एवढंच. कोणी डॉक्टर झाले , कोणी मोठ्या हुद्द्यावर पोहचले. पण आम्ही झालो एक मूर्ख लेखक. ज्याला ना सुरुवात ना अंत! उगाच शब्दांशी खेळत बसायचं हाच तो काय आमचा प्रपंच!! आणि आत्मचरित्र म्हणजे आमच्यातला वेडा माणूस उगाच सर्वांना दाखवायचा! बाकी मी फक्त लिहिणारा, आता यातून काय हाती लागते ते तुमचे तुम्हावर सोपवून मी हा प्रपंच करतो आहे. दादांच्या जाण्याने आयुष्याची खरतर दुसरी बाजू सुरू झाली. मंदा सारखी सर्वगुण संपन्न बायको आयुष्यात आली , काही दिवसात सुनील माझा मुलगा आमच्या आयुष्यात आला. पण दुःख याचंच होत की दादा!! माझे वडील हे सर्व पाहायला नव्हते. नाही म्हणायला तेवढी माझी आई आजही माझी सोबती आहे. मी आत्मचरित्र लिहितोय म्हटल्यावर शेजारच्या कुमी बद्दल त्यात काही लिहू नकोस असं तिने अगदी गमतीने सांगितल.!! आता कुमी कोण हा प्रश्न नसावा एवढीच माफक अपेक्षा !! असो, या पुस्तकाच्या रूपाने मी अगदी स्वतःशीच पुन्हा भेटेन!!  तारुण्याची मज्जा अगदी दुरून का होईना अलगद पाहून घेईन ..!! " आप्पा वहीत लिहिताना अचानक दरवाजा वाजू लागला बाहेरून आवाज आला.
"आप्पा !! आप्पा!! जेवायला येताय ना ?? "सुनील विचारू लागला.
"अरे आलोच !!" असे म्हणत आप्पा दरवाजा उघडून बाहेर आले.
"काय हो आप्पा !! एवढं काय लिहीत असता हो दरवाजा बंद करून ??"
"वेडेपणाचे खेळ रे सगळे !! बाकी काही नाही!! आमच्या सारख्या शब्द वेड्यांना काय असणार ध्यास दुसरा !!  प्रियसिची तगमग !! शांत निथळ समुद्र !! आणि एक वेडा प्रेमी!! " आप्पा मनसोक्त हसत म्हणाले.
"चला आता !! " सूनीलही हसत हसत स्वयंपाक घरात जाऊ लागला.
"आज दक्षिणोत्तर दिशा एकाच बाजूला येऊन बसल्या की काय !!! "
" अगदीच अस काही नाही !! पण आप्पांच्या खोली पासूनच एकत्र आल्या आहेत !! "  आप्पा अगदी गमतीने म्हणाले.
" बरं चला जेवायला बस!!! " आजी आप्पांची आई अचानक मध्येच म्हणाली.
जेवायला बसताच आप्पांच्या आपल्या आई सोबत कित्येक गप्पा चालू झाल्या. अचानक मंदा मध्येच म्हणाली.
"पुढच्या वर्षी सूनीलला आपण तालुक्याच्या कॉलेजात घालुयात !! शिकून मोठा झाला तर  त्याचच कल्याण होईल !! "
"आई मी कुठंही जाणार नाहीये !! "
"तुला शिकायचं नाहीये का पुढे ??"मंदा एकदम रागात येत म्हणाली.
"तसं नाहीये पण मला दुसरं काही करायचं आहे !! माझी स्वप्न माझी ध्येय वेगळी आहेत..!! " सुनील अगदी जोरात म्हणाला.
"अरे हो पण तू ते तिकडे जाऊनही करू शकतोस ना ??" आप्पा अगदी मध्यस्था सारखे बोलले.
"नाही !! मला ते इकडेच राहून करायचं !! "
"कशाच काही नाही करायचं त्याला !! नुसतं फिरायचे आहे !! "
"आई तू आता काहीही बोलू नकोस बर!! "
"अरे जेवताना तरी नकोस ना बोलू त्याला !!" आई मंदाकडे पाहत म्हणाली.
"आहो पण कधीतरी हे बोलायलाच हवं ना!!"
"मला ना बोलायचं नाहीये तुम्हाला !! "  सुनील अगदी रागारागाने ताटावरून उठून गेला.
"अरे सुनील !! थांब जेवण तरी करून जा !! " आप्पा पाठमोऱ्या सूनीलकडे पाहून म्हणाले.
  कित्येक वेळ पुन्हा आप्पा आणि मंदा दोघेच बोलत बसले.
"मंदा यापुढे तू त्याला कसलाच विषय बोलू नकोस !! "
"आहो, पण मी त्याच्या भल्यासाठीच बोलत होते ना!!!"  मंदा डोळ्याला पदर लावत म्हणाली.
"मंदा हे वयंच अस असतं की मन दुसऱ्या कोणाचं ऐकतंच नसतं !! काहीतरी करायचे आहे म्हणून धडपडत असत !! आणि मंदा मी सुनीलच्या डोळ्यात ती चमक पाहिली आहे !! मला वाटतं आपण त्याला बळजबरी करू नये !! "
"आता तुम्हीच असे म्हणताय म्हटल्यावर प्रश्नच मिटला.!! " मंदा निघून जात म्हणाली.
आप्पा खोलीत येत कित्येक विचारांशी बोलत होते. मनात कित्येक शब्द खेळत होते वहिवर येण्यास उत्सुक होते.
"आत्मचरित्र लिहिताना कदाचित मी किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन !! पण ते सगळं ढोंग असेल !! मी हट्टी आहे !! मनाला हवं ते करणारा आहे!! कॉलेजात होतो तेव्हा तर भयंकर हट्टी!! कोणाला विचारायचं नाही !! मनाला वाटेनं ते करणारा !! एकदा असेच दादांच्या सोबत जेवायला बसलो होतो, तेव्हाचा एक प्रसंग,
"कारे सदा !! " आता सदा कोण ते विचारू नका तो मीच सदाशिवराव उर्फ आप्पा.
"फुकणीच्या !! तुला पोस्टात नोकरी लावून देतो म्हटलं तर सरळ नाही म्हणालास.
"दादा!!! आहे एवढ्या मोठ्या जमिनदाराच्या पोरान पोस्टात काय नोकरी करावी बर !! "
"अरे !! जमीनदार मी !! मेल्या तुझी ती लायकी काय रे !!  उद्या वाटलं तर  एक दमडी तुझ्या नावे करणार नाही की रे !! "
"नका करू !! " मी अगदी सरळ बोलून गेलो.
"आयुष्याचे काही गणित मांडलेस की असेच फुकाचे दिवस ??" दादा अगदी ताटावर दोन बोट चढून म्हणाले.
"हो मांडलेत तर !! पण वेळ आल्यावर सांगेन !! "
"मेल्या उद्याची उद्या तालुक्याला निघून जा !! "
"दादा मला काहीतरी वेगळं करायचं आहे हो !!! " अस म्हणत मी ताटावरून उठून निघून गेलो.
यावरून दादांचं आणि माझ नात अगदी कस होत हे कळेन. पण अगदीच हाडवैर अस काही नव्हतं. दादांचं प्रस्थ काही वेगळंच होतं . ते मला नेहमी म्हणायचे,

"स्वप्नातल्या ध्येयास तू
उगाच फुंकर घाल
वेड्या मनास आज तू
उद्याची साद घाल
नसेल सोबती कोणी तरी
एकटाच तू पुढे चाल
मागे उरले काय ते पाहण्या
मनास आवर घाल..!!

मागे उरले काय ते पाहण्या .. मनास आवर घाल!! " दादांच्या ओळी सतत मनात असायच्या . आयुष्यात ध्येय गाठायचे असेल!! तर काय राहिले हे पहात बसण्यात व्यर्थ वेळ दवडू नकोस असे ते नेहमी सांगायचे...!!"
अचानक मंदा खोलीत आली. आप्पा लिहिता लिहिता थांबले.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...