मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास !!(कथा भाग ५)

"माझ्या नकारा नंतरही मला आपलस केलं याचा आनंद खूप होता त्याला!! "
सुमेधा मनोजकडे पहात म्हणाली.
"एवढं सगळं झालं तेव्हा तुला मला काहीच का सांगायचं नव्हतं ??" मनोज सुमेधा पहात होता.
"मला तुला यात गुंतवायचं नव्हतं !! "
"तू असा विचारच कसा केलास पण ??"
"त्यावेळी मला दुसर काहीच सुचलं नाही!! तुझ्यापासून दूर जायचं आणि हे सगळं विसरायचं हेच ठरवल होत मी!! आपलं प्रेम !! सगळं काही विसरायचं होतं !! पण कितीही झाल तरी मला ते नाही जमलं!! एवढं सगळं होऊनही मी रमणला सगळं विसरून माफ करण्याचा प्रयत्नही केला!! पण मनातल्या यातना काही कमी होत नव्हत्या !! " सुमेधा दरवाज्यात उभे राहून बोलू लागली.
मनोज सुमेधाच्या या सगळ्या घडलेल्या गोष्टी ऐकून स्तब्ध झाला. आज सुमेधा बद्दलचा राग त्याच्या मनात कुठेच राहिला नाही. ती अखंड जळत राहिली.
"त्यानंतर पाच दहा वर्ष असच चालू राहील. सायली माझ्या आयुष्यात होती हे एकच सुख माझ्यासाठी होत. तिच्यासाठीच जगायचं ह्या एकाच निर्णयावर मी जगत होते.!!" सुमेधा हातात कॉफी घेतं मनोजला देत बोलत होती.
"तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं याची साधी कल्पनाही मला नव्हती!! तुझ्यापासून दूर जावं म्हणून मी इकडे आलो !! आई बाबांनी खूप मनवल मला लग्नासाठी !! पण तुझी जागा दुसऱ्या कोणाला द्यावीशी वाटली नाही!!" मनोज आता सुमेधाला आपल्या मनातलं सांगत होता.
"पण माझ्या आयुष्याची शिक्षा तुला का मनोज ??! हा एकांत खूप वाईट असतो रे !! आयुष्यात सहवास हवाच ना !! " सुमेधा मनापासून बोलत होती.
"तुझ्या आठवणींचा सहवास होताच ना मला !! "
"तुझ्याही आठवणींचा सहवास होताच रे !! पण एक सोबती हवाच ना !! "
"तुझ्याशिवाय कोणीच नाही भेटलं मला आपलस !! प्रयत्न केला विसरायचं पण नाही जमलं !! " मनोज स्मित हास्य करत म्हणाला. त्या हास्यात सुमेधा बद्दल प्रेम आजही दिसत होत.
दोघांच्या गप्पा कित्येक वेळ चालल्या, मनोजला संध्याकाळ झालेली सुद्धा कळली नाही. अखेर तो जायला निघाला.
"पुन्हा भेटशील !!" मनोज सहज सुमेधाला विचारत होता.
"बघुयात !! नक्की भेटुयात !!"
मनोज सुमेधा आणि सायलीचा निरोप घेऊन निघाला. कित्येक विचारांचं काहूर त्याच्या मनात
उधळल होत. नक्की चुकलं कोण याचाच निर्णय त्याला करता येत नव्हता . मला काहीच न सांगता रमण सोबत लग्न करणारी सुमेधा चुकली होती की रागाच्या भरात तिला तसेच सोडून निघून जाणार मी चुकलो होतो. तिच्यावर बलात्कार झाला. झाला खरा !! पण तो बलात्कार राहिलाच नाही !! पण एवढं कळूनही मी तिला आपलस केलं असतं का ?? कित्येक विचार आणि मन यांचं द्वंद्व चाललं होत. चूक काय नी बरोबर काय याच्या पलिकडे सार राहील होत. जे व्हायचं ते झाल होत पण पुढे हे नात आजही तसच राहील होत.
"आई !! तुझ बाबांवर का प्रेम नव्हतं ते आज कदाचित मला कळत नसेन !! पण तुझ्या डोळ्यांतील अश्रू खूप काही बोलून गेले मला आज !! " सायली सुमेधाला जाणाऱ्या मनोजकडें पाहत म्हणाली.
सुमेधा काहीच न बोलता फक्त सायलीकडे पाहत होती.
"आपली व्यक्ती आपल्या पासून दुरावली की त्रास होतोच ना !! "
"चल सायली !! तुझ आवरून झाल ना !! "
"हो आई !! "
" आज किंवा उद्या तिकडचे काम झाले की आपण निघुयात !! "
"हो चालेल !! पण आई या सगळ्याची खरंच गरज आहे का ??" सायली प्रश्नार्थक नजरेने सुमेधाकडे पाहू लागली.
"हो !! आहे याची गरज !! कदाचित मला तुला !! आणि सगळ्यांनाच !! "
सुमेधा आता नव्या वटांच्या शोधात होती. कदाचित काही नव्या दिशेस तिला भान हरवून जायचे होते. २५ वर्षाचा तो सहवास आणि त्या नंतर जीवनात पुन्हा आलेले जुने प्रेम याची कुठे घालमेल तर होत नाही ना असा प्रश्न तिला पडला होता. म्हणून याची गरज आहे!! सायली खरंच आहे !! सुमेधा मनात बोलत होती.

मी पंख पसरून पाहिले आकाश
त्यात मज दिसले आभास
शोधूनी घेतली वाट नव्या प्रवासास
घेऊन जाते सोबती चंद्र नी ताऱ्यास
असाच हवा मज आयुष्याचा सहवास !!!

सुमेधा आज कित्येक वेळ शांतच होती. सायली ही तिला जास्त बोलत नव्हती. मनोज गेल्यापासून सायलीच आई बद्दलच कदाचित मन बदलून गेलं होत. कदाचित तिला ही ते अबोल प्रेम कळून चुकलं होतं. अशातच दोन तीन दिवस गेले. सुमेधा कित्येक वेळ काहीतरी लिहीत बसली होती. सायली आपल्या कामात व्यस्त होती.
मनोज ही आता पुन्हा सुमेधा ला पुन्हा भेटायला उत्सुक होता. सकाळपासून घरी सार आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. अचानक दरवाजा वाजल्याचा आवाज झाला. आणि तो तिकडे गेला.
"काय रे??" मनोज दारात बघत बोलला.
"साहेब पत्र आले आहे तुमचं !!"
"कोणाचं रे पत्र !! दे !! " मनोज हातात पत्र घेत म्हणाला.
दरवाजा बंद करत तो पत्र उघडत होता.

प्रिय मनोज ..

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...