मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा...!! (कथा भाग ३)

"सूनंदे , तुझ्या पोराला गप्प कर!! कोणाला माहित कोणाची घाण आहे ते !!! " सरपंच एकदम बोलून गेला.
"श्याम , तू आजीकडे जाऊन ये !! " सुनंदा सरपंचाकडे रागाने पहात म्हणाली. तीच्या ओठांवर कित्येक शब्द आले पण ते तिने परतून लावले. या सरपंचाला माझं पोर कोणाची तरी घाण वाटत. पण कित्येक वेळी हा सरपंच इथेच येतो ना घाणीत. मी वाईट मग का येतो इथे हा ! या गोष्टी वाईट वाटतात मग माझ्याकडे आल्यावर याला शांतता का भेटते, पण फक्त स्वतःची शांतता. कधी या नीच माणसाने विचार केलाय माझा किंवा स्वतःचा बायकोचा तरी. नाहीना !! याला फक्त स्वत:ची शांतता हवी आहे. खरंच ही स्वार्थी वृत्ती कधीच कमी होत नाही. म्हणून मला वेश्या , रांड केलं जातं. फक्त आणि फक्त या स्वार्थी आणि नीच माणसांसाठी.
"ये !!! कुठ आहे लक्ष?? " चला!! " सरपंच एकदम बोलला.
"हो !! आले !! " सुनंदा सरपंचाच्या जवळ जात बोलली.
श्याम कित्येक वेळ बाहेरच बसून होता. तो आजीकडे गेलाच नाही. कित्येक वेळा नंतर सूनंदाने दरवाजा उघडला. सरपंच अगदी लपत निघून गेला.
"आई , कोण आहे तो?? मला नेहमी रागवतोच बघ !!! " श्याम सूनंदाकडे पहात म्हणाला.
"कोणी नाही !! चल तू घरात !! तुला म्हटलं होत ना आजीकडे जा म्हणून!! सुनंदा श्यामचा हात हातात घेत म्हणाली.
"श्याम , अंग गरम लागतंय रे तुझ !! "
"नाही आई , बाहेर झोपलो होतो ना!! त्यामुळे वाटत असेन. " श्याम आईला समजावत बोलला.
  श्यामला ताप आला होता हे सुनंदा ने ओळखले होते. पण एवढ्या रात्री कोण वैद्य भेटेल म्हणुंती सकाळची वाट पाहू लागली. घरगुती काही उपायही केले तिने.
"आई , तू पण झोप ना!! " श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
"नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! " सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
"आई , तू एवढी छान आहेस !! मग या लोकांना तू वाईट का वाटतेस ??"  श्यामच्या या प्रश्नाने सुनंदा काहीवेळ निशब्द झाली.
"कदाचित त्यांना मी फक्त बाहेरूनच कळले!! मनात कोणी कधी डोकावलच नाही रे !! म्हणून असेन कदाचित!!"
"म्हणजे काय आई ??"
"काही नाही बाळा!! " झोप तू!!! अस म्हणताच श्याम अलगद डोळे मिटून झोपी गेला. पण सुनंदा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दिव्याकडे पहात राहिली. कदाचित तिला श्यामला सांगायचं होत की " भावनेच्या पलिकडे वासना राहते आणि तिला मन कधी कळलंच नाही. तुझ्या नशिबी ही नरकं यातना देणारी मी, मला वाईट म्हटलं तर काही चुकीचं नाही. माझ्यासारख्या वेश्येच्या उदरात तुझ्या सारखं गोड आणि हुशार पोर देऊन कदाचित त्या विधात्याने तुझ्यावर अन्यायच केला आहे. मी वाईट आहे पण तुझ काय रे !! तुलाही हा समाज रांडेच पोर म्हणूनच हिणावतच ना!! हा दोष फक्त माझा!! त्याचीच शिक्षा कदाचित मी भोगते आहे!! तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होऊ न द्यायची म्हणूनच मला तुला शिकवुन मोठं करायचं आहे. या नरकातून बाहेर काढायचं आहे. असंख्य विचारांचा गोंधळ रात्रभर मनात करत सुनंदा झोपी गेली.
सकाळी तिला जाग आली ती शेजारच्या आजीने दरवाजा वाजवला तेव्हा.
"सुनंदा !! ये सुनंदा!! " आजी दरवाजा वाजवत बोलली.
"आले !! " दरवाजा उघडताच आजी आत आली.
"काय ग !! कधी गेला मग तो खवीस!! " आजी अगदी तिरस्काराने बोलत होती.
"रात्री उशिरा गेले सरपंच !! ते गेले आणि श्यामला पाहिलं. म्हटलं होत त्याला तुझ्याकडे झोपायला जा म्हणून पण नाही, झोपला बाहेरच!! ताप आलीय त्याला!!"
"काय म्हणायंच या पोराला!! मधे पण असाच रात्री आला होता हा तुझ्याकडं माझा डोळा चुकवून!! आई शिवाय क्षणभरपण राहत नाही पोर!! " आजी श्यामच्या जवळ जात म्हणाली. श्याम अजूनही झोपला होता. डोक्यावर हात ठेवत आजी म्हणाली.
"बाई !! ताप जास्तच वाटतोय ग आता !!! "
"रात्रीपासून आहे !!! " सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
"शेजारच्या वाडीतल्या वैद्याकडे घेऊन जा बरं पटकन त्याला!! " आजी काळजीच्या स्वरात म्हणाली.
"हो आता आवरून जाणारच आहे!!"
"तोपर्यंत त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते मी!! "आजी एकदम पुढे सरकत म्हणाली.
सुनंदा सगळं आवरू लागली. आपलं पोर बर होत नाही तोपर्यंत तीच मन कुठेच लागतं नव्हतं.
"ये सुनंदा!!"
"कोण आहे !!"
"मी आहे सरपंच!! "
"सरपंच तुम्ही या वेळी ?? " माझ्या पोराला बर वाटत नाही सरपंच जाऊ द्या मला!!!" सुनंदा केविलवाणी विनवणी करत सरपंचाला बोलत होती.
"ये , असली नाटक माझ्या समोर नाही करायची !! रांड साली!! मला नाही म्हणती !! " सुनंदाला कानाखाली मारत सरपंच खोलीत घेऊन गेला. आजी कित्येक वेळ श्याम जवळ बसून त्याची काळजी घेत होती.
"सरपंच , पोराला खूप ताप आलंय मला लवकर जायचं आहे !"
"ये , मरू दे मेल तर ते!! मला उगाच त्रास देऊ नकोस !!! "
कित्येक वेळ गेला, सरपंच आला आणि वासनेच्या जगात बुडून गेला ही. सुनंदा पलंगावर पडून होती डोळ्यात पाणी होते आणि अंगावर कित्येक घाव, तिच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू एकच बोलत होता, " अरे हा बलात्कार नाही तर काय आहे? पण तुम्हाला, या समाजाला हा बलात्कार वाटणार नाही कारण वेश्येला कुठली आलीय इज्जत ना?? " तिच्या मनाला काहीच नसेन ना वाटत आता!! शेजारी फेकलेल्या पैश्याना हातही लावू वाटत नसेन या घुसमटलेल्या जीवना पुढे. अरे हो असे बलात्कार काय होतच असतील ना !! त्यात नवल काय ते!!! कारण इथे फक्त वासना नांदते!!
"सुनंदा !! ये पोरी !! चल लवकर!! श्यामकडे चल पटकन!! " आजी एकदम ओरडतच आली.
  आजीच्या बोललण्याने सुनंदा एकदम भानावर आली . अंगावरचे कपडे नीट करत ती श्यांमकडे गेली.
"श्याम !! काय झाल बाळ !! उठ ना!! उठ ना रे बाळा!!! "

क्रमशः....

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...