मुख्य सामग्रीवर वगळा

मनातल थोड

   डोळ्यात पाणी असते आणि मनात एक खंत. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचे परक्याचे भाव मनात दुसरं काय आणु शकतात. रोज अगदी न चुकता आपली आठवण काढणारी व्यक्ती अगदीच परक्या सारखी वागू लागली तर काय करावे हेच कधी कळत नाही आणि सुरू होतो उनिवांचा खेळ. कमीपणाचे काही भाव आणि नात्यांची तुटलेली विण बाकी काय असू शकते. खरतर खूप सोपं असतं मनातल सांगणं , नात्यात असे दुरवे आले तर मनातल अगदी बोलून टाकावं त्या व्यक्तीला आणि सगळे कींतू काढून टाकावे अस खूप वेळा वाटत आणि उरतो काही गोष्टींचा विचार. पण का होतो हा दुरावा कधी शोधलय कोणी!!  नात्यातला अतिरेक याच उत्तर असू शकते का ?? की आपली आपले पणाची भावना सगळ्या काही बिघडून टाकते. खरतर तुम्ही म्हणाल नात्यातील अतिरेक  म्हणजे तरी काय नक्की !! की नात मर्यादेत राहून ठेवायचं. नाही ना !! मग का होतो हा दुरवा नात्यांत आणि ती तुटलेली विण उरते फक्त.
   शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!!  चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या गोड आठवणी आठवत बसायचं एवढंच राहत तेव्हा. आणि आपल्या नात्यांची झालेली ती अवस्था पहात रडायचं. अश्रूही कदाचित रागावतील कधी असच नात जीवनभर ठेवलं तर. नाही का ?? म्हणूनच वाटलं की सांगून मोकळं व्हायचं त्या व्यक्तीला की माझ इथे चुकलं आणि तुझ तिथे. नात्यात खरतर चुका विसरायचा असतात पण चुका फक्त आठवणाऱ्या व्यक्ती नात कधी जपू शकणार नाहीत हे तितकच खर आहे ना!!
   वाटलं तर केलं नात आणि गरज संपली की तोडून टाकलं याला नात म्हणावं तरी का?? तो सरळ सरळ एक हिशोब असतो. हिशोब असतो तुटलेल्या भावनेचा, हिशोब असतो गोड आठवणींचा. गरेज पुरत नातं संपुष्टात यायला असही वेळ लागत नाही. पण ज्याला हे कधी कळलं नाही त्याला मनावर आघात झाल्या शिवाय राहिला नाही. नात नात आणि फक्त नात.  विचाराचा कल्लोळ आणि ती व्यक्ती, पण मी म्हणेन एवढं विचार करूच नये ,तुम्ही आता हे  वाचताना ज्याचा विचार करत आहात त्याला पहील मनातल सांगून पाहा.
बघा कदाचित तुटलेल्या नात्याला पुन्हा पालवी फुटेल. हो कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पहिल्या सारखी बोलणारी नाही पण मनातल सगळं सांगितलं ही भावना तुम्हाला स्वस्थ बसू देईन.

करून तरी पाहा ...😊😊😊😊
-योगेश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...