मुख्य सामग्रीवर वगळा

रंग प्रेमाचे..!!

   प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी मनापासून बोलावं लागतं. कधी तिच्या कधी आपल्या मनातल आपोआप ओळखावं लागतं. कधी हिरवळ असते मनात तर कधी उजाड आठवणींचा डोंगर आणि त्यात प्रेमासाठी आसुसलेली ती मनातली व्यक्ती. सगळं काही आपलं असतं पण ते मन मात्र कोणाचं तरी झालेलं असतं. सतत ते आपल्याला बोलत असत की त्या व्यक्तीला त्याला पहायचं असत. त्या व्यक्ती समोर व्यक्त व्हायचं असतं. पण कस व्हावं व्यक्त कळतच नसत आणि मनाची घालमेल शांत बसूच देत नसते. कस करावं व्यक्त प्रेम मनातल आणि कस सांगावं त्याला ज्याला हे आवडेल आपले मन. कुठेतरी हा मनाचा गोंधळ प्रेमात पडलेल्या प्रत्येकाचा असतो ! ती नाही म्हणाली तर काय करायचं आणि मग मनाला कस सावरायचं अश्या असंख्य विचारांचा गोंधळ प्रेमात पडलं की सुरूच होतो.
 
डोळ्यातला तो भाव माझ्या
तुझ्या मनास कळेल का
प्रेम माझे किती तुझ्यावर
तुला न सांगता कळेल का!!

  खरंच ना!! मनातल प्रेम त्या व्यक्तीला न सांगताही कळेल ना!!  मनातली ती सुंदर तिची आठवण पुन्हा तिला बघेन ना! असे मनाचे कित्येक भाव मनाच्या पटलावर तरंगत राहतात आणि आपण फक्त त्यात वाहत राहतो. व्हॅलेंटाईन डेला तिला सांगुनच टाकायचं की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते !! असे ठरवून कित्येक मन त्या दिवशी व्यक्तही होतात. अखेर मनाला जे हवं ते तेच करत राहत. आपल्या आवडत्या व्यक्तीला हवं ते द्यायचं अस मन म्हणत असतं, पण मन फक्त प्रेम मागत असतं. अगदी प्रेम व्यक्त करताना त्या व्यक्तीला आपलं मन कळण खूप गरजेचं असतं. मग ते प्रेम कसे ही व्यक्त केले तरी. प्रेमाला ना पैसा लागतो ना प्रेमाला मोठी गिफ्ट त्याला फक्त प्रेम हवं असतं. ते मनापासून सुरु होत आणि मनापाशी जावून थांबतं.

नको मला कोणते वचन
फक्त तुझी सोबत हवी
तुझ्या असण्याची जाणीव
फक्त मनास देत राहावी

  ती जाणीव त्या मनाला आपलंसं करते. कधी सोबत मागते आणि कधी एकाकी आठवणीत रडते.  अश्या या मनाला कस व्यक्त करावं . कारण त्याला फक्त ती व्यक्ती हवी असते. हळुवार झुळूक यावी आणि तिची सोबत असावी. प्रेम मनात असले तरी, ती सतत समोर असावी. ती प्रत्येक झुळूक आपल्याला बोलावी आणि आपण मनातली गोष्ट तिला सांगावी. अगदी सूर्यास्त होताना, तिला समुद्र किनारी त्या लाटांच्या आवाजात आपलं मन मोकळं कराव आणि तिने मंद हसून ती संध्याकाळ गोड करावी. बाकी काय हवं या मनाला! असे कित्येक विचार आणि कल्पना फक्त त्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी. फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी.
   हो ना? फक्त व्यक्त करण्यासाठी!!  माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे शब्दात सांगण्यासाठी. अगदी मनापासून बोलण्यासाठी. ही मनाची धडपड फक्त त्या व्यक्तीला आपलं करण्यासाठीच. कधी समोर ती येताच नजरेतून तिला पाहण्यासाठीच. कधी नुसती ऐकून घेण्यासाठी, तर कधी मनसोक्त बोलण्यासाठी. ही धडपड मनाची फक्त त्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी. त्या वाटेवर चालताना सोबत हवी फक्त तिची आणि त्या मनाला आपलंसं करण्याची ओढ. खरंच किती सुंदर आहे ना मनातली ती भावना! क्षणाक्षणाला प्रेम करताना फक्त नजरेतून भरून घ्यायचं, अल्लड होऊन राहायचं. आपलंसं अस कोणी आहे ही भावना मनाला अजुन आनंद देते आणि ती व्यक्ती आपली झाल्यावर तिच्यासाठी काहीही करायला तयार होते. कधी तिला पाहायला तळमळत असते, कधी आपलंसं करायला धडपडत असते, हे मन फक्त प्रेम करत असते.

नाजुक या नात्याची सुरुवात
मनाच्या एका कोपऱ्यात होते
आपण आपले असलो तरी
ते मन मात्र दुसऱ्याचे होते

  प्रेम !! खरंच खूप छान असतं. प्रेमात पडलं की माणसाला दुसरं काही सुचत नसतं. प्रेमाला वय नसतं ना प्रेमाला जात नसते, प्रेमाला धर्म नसतो ना प्रेमाला नाव नसते, प्रेम फक्त प्रेम असते, हळू हळू सुरू झालेल्या या भावनांचा खेळ पुढे आयुष्य व्यापून टाकतो आणि उरते अखेर पर्यंत प्रेम. आपण त्याचा तिरस्कार करू शकत नाही ना आपण त्याला विसरू शकत नाही. फक्त व्यक्त करू शकतो, कधी शब्दाने तर कधी कृतीने.
कधी नजरेने तर कधी स्पर्शाने. प्रेम खरंच प्रेम राहते. आयुष्याची संध्याकाळ होताना ती माझ्या सोबत हवी जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. नकोच मला बाकी काही!! अखेरचा श्वास तिच्या नावावर करायचा आहे !! एवढंच हवं या मनाला. कारण, आपण पुढे सोबत नसलो तरी ते प्रेम तसच राहतं, आठवणीत , नजरेच्या कडांमधे आणि आपल्या शब्दांमधे ते तसंच राहतं, शेवटी प्रेम तरी काय म्हणत,

साऱ्या श्र्वासांचे हे ओझे
मी फक्त तुझ्यासाठी पेलले
अखेरचा ही श्वास मी
तुझ्यासाठीच खर्ची केला

आयुष्य जगलो मी फक्त ज्या व्यक्ती वर प्रेम केलं तिच्यासाठी. अगदी अखेरचा श्वास हि मी तिच्यासाठीच दिला, अस प्रेम आयुष्यभर सोबत हवं . कधी अबोल होऊन रहावं, कधी हळूच येऊन हसावं , कधी उगाच रुसून बसावं, तर कधी अचानक घट्ट मिठीत यावं, पण हे प्रेम सतत सोबत असाव. अगदी वयाच्या संध्याकाळी ही त्याने ते सतत व्यक्त व्हावं. कारण प्रेम कधीच म्हातारं होतं नाही, ते तरुणच राहतं . अगदी मनात मनाच्या कोपऱ्यात ते सतत अजून प्रेम करत राहत. कधी ती व्यक्ती क्षणभर ही दुरावली तर तिच्या विरहात राहत, तिला जवळ करण्यास धडपडत राहत, पण हे मन प्रेम करत राहतं. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ते सांगणं खूप गरजेचं असतं. मनाला व्यक्त व्हावं लागतं त्याच्या समोर ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
  अखेर आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती ही आपल्यावर प्रेम करावी अस काहीच नसतं. आपण फक्त प्रेम करायचं असतं. कारण प्रेमात कोणतं बंधन नसतं. प्रेम ही फक्त द्यायची गोष्ट असते, आणि प्रेम आपण करुत तसे ते आपल्यालाही मिळतच असते. प्रेमात वेळ द्यावा लागतो, समोरच्याला ही आपलं अस कोणी आहे हे जाणवू द्यावं लागतं. त्यामुळे ती व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत नसेल तर आपण लगेच नाराज नसतं होऊन जायचं. कारण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करायला अजुन तेवढी अशी तयार नसते. आपण फक्त प्रेम करायचं. शब्दातून , आपल्या वागण्यातून , आपल्या मनातून फक्त प्रेम करायचं. पण प्रेम व्यक्त मात्र नक्की करायचं , मनात नाही ठेवायचं.

कसे हे भाव प्रेमाचे
मनास काही कळले का
किती हे प्रेम माझे तरी
तिला ते कधी कळेल का?

   अश्या अनेक छटा प्रेमाच्या किती आणि कशा सांगाव्या . प्रेम ही संकल्पना समजून नाही तर अनुभवातून कळते. अगदी वयाच्या ६० वर्षातही एक प्रेमी जोडपे व्हॅलेंटाईन डेला न चुकता आपले प्रेम व्यक्त करते. अगदी क्षणाक्षणाला व्यक्त करते. हे प्रेम खरंच किती सुंदर असते...  हो ना???.

नाजुक नात्यांची अलगद सुरुवात
मनातून मनापाशी जावून मिळावी
घट्ट व्हावी ती नाती प्रेमाची
अखेरच्या क्षणी ही ती अतूट राहावी ...

  प्रेम शेवटपर्यंत कायम तसेच रहावें. कितीही रुसवे फुगवे असले तरी साथ तशीच हवी.  आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ती सतत जाणवावी. कारणं प्रेम कितीही केलं तरी शेवटी ते कमीच असतं. पण व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. पण व्यक्त करणं म्हणजे तरी काय नक्की हेही कळायला हवं. प्रेमात आपल्या प्रियकराचा स्वभाव लक्षात घ्यायला हवा. कधी एकांत हवा असतो तर कधी सोबत. प्रेमात आपण समोरच्याला समजून घेणं गरजेचं असतं. कधी कधी प्रेम कवितेतून व्यक्त होत तर कधी प्रेम अबोल राहूनही व्यक्त होत. प्रेमाच्या या रंगाला समजून घेतलं पाहिजे. तिच्या मनातल आपल्याला न बोलताही समजल पाहिजे. अगदी डोळ्यातील अश्रूही प्रेमात खुप काही बोलतात. तर कधी हसण्या मागचे प्रेमही कळायला हवे. शेवटी प्रेमात दोघांनाही एकमेकांच्या मनाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. ती रागावली तर याने रुसवा काढायला हवा. ती कधी उदास असेन तर याने तिला आनंदी करायला हवं. ती कधी आनंदी असेन तर मनातल सगळ दुःख विसरून तिच्या सोबत मनसोक्त हसायला हवं. शेवटी प्रेम हे समजून घेण्यातच असतं.

कधी रुसवा कधी गोडवा
प्रेमाचे हे कित्येक रंग
कधी अश्रू कधी हसू
मनात असतात कित्येक तरंग

  अशा या प्रेमाच्या दुनियेत सगळ्यांनी अगदी हरवू जावं . आपल्या आवडत्या व्यक्तीला मनसोक्त प्रेम द्यावं . क्षणाक्षणाला हे प्रेम वाढतच जावं. आणि प्रेमाच्या कित्येक रंगात न्हाऊन जावं. सोबतीस असावी ती कविता जी फक्त तिच्यासाठीच लिहावी. प्रत्येक शब्दावर फक्त तिचीच आठवण असावी. आणि चिंब पावसात भिजणारी एक ती गोड सोबत असावी, अगदी कायमची.
✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...