मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग ६) शेवट

सतत सोबत हवी वाटणारी व्यक्ती आता नकोशी का वाटावी. कदाचित नात आता उरलेच न्हवते. उरल्या होत्या फक्त समज गैरसमज याच्या वाईट आठवणीं. मी कदाचित चुकलो असेन पण माझं प्रेम आजही तसच आहे. कदाचित समीर आणि सायलीच मन हेच बोलत असेल. समीर आता जाण्यासाठी तयार झाला होता. सायलीला त्याने जाऊ नये असच वाटत होत. कित्येक दिवस एकमेकांना एका शब्दानेही ते बोलले न्हवते.
"समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!" समीरची आई समीरकडे पहात म्हणाली.
"काय आई !! बोलणं!!! "
"कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !!  भांडणं झाल का तुमचं ??" आईच्या या अनपेक्षित प्रश्नाने समीर गोंधळून गेला.
"नाही आई , काहीच नाही झाल !! "
"मग मध्ये तिच्या वाढदिवसाला पण नाहीस आला!!काय झालंय का मला सांग !! "
"आई ,कित्येक गोष्टी मला नाहीत पटत, माझ्या प्रत्येक गोष्टीत मी तिला जवळ केलं पण ती मलां काहीच सांगत नाही!! "
"समीर नात्यांमध्ये कोणी काही सांगावं याच बंधन नसतं !! तुझ्या वहीतली एकही कविता तू जिच्यासाठी लिहिली तिला सांगितली नाहीस!!पण तिच्या नजरेत तुला आपल करण्याची ओढ कधी दिसलीच नाही!! समीर मी आई आहे तुझी !! त्या दिवशी सायली समोरून गेल्यावर तू कविता म्हणाला होतास तेव्हाच मी तुझ्या नजरेत तिच्याबद्दल प्रेम वाचलं होत!!" समीरची आई समीरला सगळं काही मनातल सांगत होती.
"तू तिला बोलला नाहीस !! पण तुलां ती तिच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी बोलवायला आली !! "
"पण आई तिला मला बोलायचं नाही आता !! आणि मीही नाही बोलणार तिला !! " समीर आईकडे पाहत म्हणाला.
"तिला बोलायचं नाहीये हे तू कस ठरवलं!! सतत काही कारण काढून ती माझ्याकडे येते पण तिला तुला बोलायचं असतं!! आणि तू प्रत्येक वेळी निघून जातोस!!"
समीरला काय बोलावं तेच कळेना तुषार आणि सचिनचं ऐकून आपण मोठी चूक तर केली नाहीना असे त्याला वाटू लागले. तो कित्येक वेळ सायली चा विचार करू लागला. खरंच आपण चुकलो याची जाणीव त्याला झाली होती.  कारण आपण सायलीला बोलायला हवं होत, गैरसमजच, विचारांचं चक्र बंद करून टाकते आणि उरतो फक्त अंधार. समीर आता परगावी जाण्यास निघणार होता. या सर्व गोष्टींचा विचार करणं बंद करायचं आणि आपण नव्याने सुरुवात करायची अस त्याने ठरवलं होत.
  सगळी तयारी झाली होती. समीरची आई अश्रू अनावर होऊन समीरकडे पाहून रडत होती. ज्याच्याशिवय एक दिवस राहू शकत नाही तो समीर आता तिला सोडून परगावी चालला होता. आईचा आशीर्वाद घेऊन तो बाहेर पडला तसा ,सायली समोरच उभा होती.
"कायमचा निघून चाललास??" सायली अचानक बोलून गेली.
"का??"
"तिकडे नोकरीची संधी आली म्हणून!!" समीर तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"माझ्यापासून दूर जायचं आहे म्हणुन सांग ना सरळ!! मी चांगली मुलगी नाहीये ना म्हणून ना ?? "
"अस का म्हणतेय सायली !!! तू चांगली मुलगी नाहीस अस मी कधी म्हणालो का ??"
"हो म्हणाला होतास ना !! की मी मागे असते तुझ्या सारखं !! मी वाईट आहे !! " सायली डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"तुला वाईट म्हणणं शक्यच नाही!! "
कित्येक वेळ दोघं एकमेकांशी बोलत होते. सायली आणि समीर यांना आपल्या चुका कळून आल्या होत्या.
भांडले ही दोघे. समीर आता जाण्यास निघाला होता. पण सायली त्याला जाऊच देत न्हवती. गैरसमज किती वाईट असतो हे दोघांना कळून आले होते.
"मग !! जायचं परगावी अजुन !! मला सोडून !!! " सायली समीरकडे पाहून म्हणताचं.
"नाही जाणार आता !! "
"छान , आणि आधीच का नाही बोललास तू मला !! किती ते गैरसमज माझ्याबद्दल !! " आणि यापुढे कोणाचही ऐकायचं नाहीस कळलं!! "
"हो बाबा कळलं मला !! " समीर माफी मागत म्हणाला .
"चल संध्याकाळ झाली !! गच्चीवर जायचं नाही का आज ??" सायली मिश्किल हसत म्हणाली.
"तुझी सोबत हवी आज मला तिथे !! "
दोघेही कित्येक वेळ गच्चीवर बसून तो सुर्यास्त पहात होते. सायलीकडे पाहत समीर म्हणाला.

" "कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!"
"तूच लिहीस आहेस ना ?? " सायली समीरला विचारू लागली.
"हो !! "
"माझ्यासाठी?? "
"नाही !!! तो सुंदर सूर्यास्त होतो ना त्यासाठी!! " समीर मस्करित सायलीला म्हणाला.
  त्या सुंदर सूर्यास्ता मधे समीर आणि सायली कित्येक वेळ गच्चीवर बसून होते. गैरसमज याचा सूर्यास्त केव्हाच झाला होता . उरला होता फक्त सुंदर क्षणाचा सूर्यास्त .... !!!

*समाप्त*

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...