मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग -२)

"काहीही म्हणते आई !! " समीर मनातल्या मनात म्हणाला.
सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच होत असे. तो सतत तिच्या नजरेस पडत असे. दोघांमध्ये येता जाता बोलण होत.
"समीर अरे मला तुझी थोडी मदत हवी होती!!"  सायली जाणाऱ्या समीरकडे पाहत म्हणाली.
"अरे वाह !! सायलीला चक्क माझी गरज पडावी!! क्या बात है!! " समीर सायलीकडे हसत म्हणाला.
" हो अरे !! मला काही विचारायचं होते तुला !! "
" विचार ना !! " समीर उत्सुकतेने म्हणाला.
"नाही जाऊदे !! नंतर विचारते !!! आत्ता नको!! "
"सायली विचार तरी !!!" समीर सायलीला म्हणाला.
"समीर माणूस प्रेमात पडलेले कसे कळते रे !!" सायली अचानक म्हणून गेली.
समीरला या प्रश्नाचं उत्तर कसे द्यावे तेच कळतं न्हवते. तो कित्येक वेळ शांत राहिला.
"तुला का हे विचारावं वाटलं सायली? कोणाच्या प्रेमात पडली आहेस का??
" नाहीरे !! असं काही नाही .!! सहजच विचारते तुला मी!! "
"पण सायली प्रेमात पडलेले कळतं अस नाही !! पण ते लक्षात येत असही नाही!! तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू!! "  समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"समीर तु प्रेम करतोस कोणावर??"
समीर काहीच न बोलता निघून गेला. कित्येक वेळ सायली त्याच्या प्रेमाची व्याख्या आठवत होती. आनंद आणि अश्रू यातच प्रेम कसे असेल? याचा हिशोब ती करत होती. कदाचित समीरला काहीतरी बोलायचं असेन पण ते शब्द कुठेतरी विरले असतीन का असे तिला वाटत होते.
  समीर आता मित्रासोबत बाहेर आला होता. त्याच्या मनात सायली बद्दल अनेक विचार फिरत होते.
"समीर अरे कोणत्या विचारात आहेस?" समीरचा मित्र सचिन त्याला म्हणत होता.
"काही नाहीरे सचिन, सायली आज प्रेम म्हणजे काय विचारत होती मला !! पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो !!"
"काय विचारलं तिने अस??" सचिन समीरला विचारू लागला.
"प्रेम करतोस कोणावर अस विचारत होती मला !!"
"समीर बहुतेक ती तूषारच्या प्रेमात आहे!! मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत!! नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर !! "
सचिनच्या या बोलण्याने समीर नक्कीच मनात कुठेतरी दुखावला होता. पण का ??  मनात कुठेतरी  सायली बद्दल असलेली प्रेमाची भावना समीरला शांत बसू देत न्हवती.
" ती कविता तिच्याकडे पाहूनच सुचली होती ना ?? " समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला? असे कित्येक विचार करत समीर घरी आला. नीट जेवला ही नाही.
सचिन ने सांगितल्या पासून समीरच वागणं सायली बद्दल पूर्ण बदलून गेलं होत. तो आता तिच्याशी थोड तुटकच बोलू लागला होता. आणि ही गोष्ट सायलीच्या ही लक्षात आली होती. तेव्हा
"समीर अरे कुठे आहेस ??" सायली समीरच्या समोर येत म्हणाली.
"आहे इथेच, कुठे जाणार दुसरीकडे??"
"भेटलाच नाहीस म्हणून विचारलं!! "
"रोज भेटाव अस काही आहे का ??"
"समीर तु असा का बोलतोयस ??"
"मग कस बोलायचं सांग मला !!!"
"काहीं झालंय का ?"  सायली समीरकडे पाहत होती.
"काहीं उरलेच नाही आता !!"समीर अगदी रागात म्हणाला.
    प्रेम आणि मी !! अस आईला म्हणनारा समीर सायलीच्या प्रेमात पडला होता. वरवर ते त्याला कळत न्हवते. पण त्याची वागणूक आता तेच सांगत होती. सायली  पुन्हा पुन्हा त्याला बोलतं होती. पण समीरच्या मनात काही वेगळच चाललं होत. सायली आणि तुषार यांच्यात खरंच काही आहे का ?? सचिन म्हणतोय ते खरं असेन का ?? की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिचं मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर?? असा मनात विचार येताच समीर त्याला भेटायला निघाला . मनातल्या वादळास कुठेतरी निवारा शोधायला निघाला.

क्रमशः...

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...