मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचा गोंधळ...!!

कधी शब्द सुचत नाहीत तर कधी स्वतः मनात घोळतात. याच नक्की होते तरी काय हेच कधी समजत नाही. तुम्ही तासन् तास लिहायचं म्हणून बसता आणि एक ओळही लिहून होत नाही आणि कधी कधी स्वतः शब्द मनात कोरले जातात. मला आजही कित्येक कविता लेख लिहिताना याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. कधी कधी तासन् तास बसून लिहिलेल्या ओळी मनास भावत नाहीत आणि कधी कधी सहज सुचलेल्या चारच ओळी मनात घर करतात. असे होत तरी काय की मनातले खेळ समजु शकत नाही. भावना मनातल्या खुप काही बोलतात. तर कधी बोलायचं म्हटल तरी शब्द सुचत नाहीत. कदाचित लिहिण्यासाठी त्या भावना भेटत नाहीत.  उरतात कधी नुसते शब्द आणि कधी कधीं नुसत्या ओळी..

मनातल्या भावना आज
सहज कोऱ्या कागदावर आल्या
कधी नुसत्या भावना होत्या
कधी नुसत्या ओळी आल्या

  म्हणजे नक्की म्हणायचं तरी काय मला तेच कधी कळतं नाही. आणि कधी न बोलता ही सर्व काही त्या ओळी बोलून गेल्या. माझ्या मनातल्या खुप काही गोष्टी मी अशाच व्यक्त झालो. कित्येकदा त्या मनास भिडल्या पण कित्येकदा नुसत्या ओळीच राहिल्या. मग लिहावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न मनी राहिला. मी समजलो का तुला  प्रश्नही कधी मनात आला. आणि कधी न लिहिता ही सर्व काही बोलला. अस लिहिताना का होतश? मी आज कित्येक वर्ष झाले ब्लॉग मार्फत किंवा कविता , लेख मार्फत लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. पण तो कित्येक मनाला भिडला हा प्रश्न कधी स्वतःला ही मी विचारला नाही. मी फक्त लिहीत राहिलो. व्यक्त होत राहिलो. असं म्हणतात की लेखणी हे समोरच्याला व्यक्त करून सांगण्याच सर्वात सुंदर साधन आहे. पण ही लेखणीही जर व्यर्थ ठरत असेल तर लिहावं तरी का असा प्रश्नही मनात आला.

कुठे बंदिस्त कवाड या मनाचे
लेखणी तु व्यक्त केलेस
घुसमटलेल्या विचारांचे
किती तु शब्दांनी खेळ केलेस

  मग कुठे अधुरे राहिले हे शब्द नी समोरचे मन कधी समजुच शकले नाही. आज मागे वळून पाहताना मला कित्येक प्रश्न हेच पडतात. मी का व्यक्त झालो आणि कोणासाठी. माझी लेखणी अधुरीच राहिली त्या मनासाठी जिथे शब्द पोहोचलेच नाहीत. कधी कधी लिहिलेलं सगळं व्यर्थ वाटतं. पण तरीही मनातले ते विचार शांत बसूच देत नाहीत आणि पुन्हा लेखणी हातात येते. होतो विचारांचा नुसता गोंधळ आणि शब्द हे आपोआप कागडव कोरले जातात. माहीत असतं हे सगळं व्यर्थ आहे पण ते तरी लिहिले जातात कोणासाठी तर बंद झालेल्या कवाडावर जाऊन निरर्थक पडण्यासाठी. कधी कधी मला वाटतही की ते शब्दही आता माझा तिरस्कार तर करतं नसतील ना? की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना? की लिहितोस तू इतका की समोरच्या मनाला साधं समजूनही सांगता येत नाही. मग आरे बंद कर तो व्यर्थ प्रयत्न तुझ्या लेखणीत तेवढी धमक ही साधी नाही.

लेखणी तुझी व्यर्थ बडबडत असते
नसेल त्याला अर्थ काही
दे फेकून ती कागदांची आठवण
ज्यात जळेल फक्त तुझे मन

  वाटतं तेव्हा द्यावं फेकून ते लिखाण वहीत बंदिस्त केलेलं त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळांत आणि मनाला सांगावं तुलाही असाच जळाव लागेल. पण तुझ्या ज्वाला दिसतं मात्र नाहीत रे.!! घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे?? मन कोणते ते बंदिस्त कवाडत आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला?? नाही ना ?? मग जळत रहा कायमच अगदी शेवटपर्यंत !! कारण तुला दुसरी चीता च नाही!

शब्दही साथ सोडतील तुझी
अशी कशी रे कवाड मनाची
जळून गेली मनात सारी व्यथा
अशी कोणती साथ आपल्यांची??

शेवटी एवढंच लिहावस वाटतं

किती विचार आणि किती लिहावे
व्यर्थ सारे वाहून जावे.
नसेल अंत या लिखाणास कुठे तर
स्वतःस का मग जाळून घ्यावे.

अखेर....!!!!!

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...