मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्बीण (कथा भाग ३)

" अरे होरे सदा !! त्या तिथे सायकलच वाटते!!"
सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले.
"लता सदाच्या दुर्बिणीच प्रश्न सुटला! मी ही माझी सायकल विकून त्याला दुर्बीण घेऊन देणार आता!!
"आहो पण ती सायकल तुम्हाला तुमच्या शाळेत असताना बक्षीस म्हणून मिळाली आहे!!" सदाची आई एकदम म्हणाली.
"मुलाच्या स्वप्नासमोर मला हे बक्षीस काही नाही लता !! आणि या बक्षिसांने दिली की साथ तब्बल २५ वर्ष !! आता या सायकलने ते चंद्र नी तारे सदासाठी जवळ येतील!!" बाबा सायकलकडे पाहत म्हणाले.
"पुन्हा एकदा विचार करा!! तुम्हाला ही सायकल किती प्रिय आहे माहितेय मला !! ""
"आता फक्त दुर्बीण आपल्या सदासाठी!!"
सायकल !! सदाच्या स्वप्नांचा रस्ता सोपा करण्यासाठी विकायची, पण हे करावं लागणारच ना !! नाहीतर मग सदाला ते चंद्र जवळून कसे पाहता येतीन. सायकल !! कामावर जाताना रोज पुसायचो मी तिला !! खूप साथ दिली मला तिने!! लता आणि मी पहिले याचं सायकल वर गेलो होतोत फिरायला!!  कशी डौलाने दिसतेय पाहा ती माझी सोबतीन सायकल...!! बाबांच्या मनात विचारांचा काहूर होता. रात्रभर नुसता विचार मनाला भंडावून सोडत होता. अशाच विचारात सकाळचं उन सरवत्र पसरलं. घरात लगबग सुरू झाली.
"लता आज जाऊन येतो त्या राजू सायकलवाल्याकडे पाहतो किती म्हणतोय ते!! पण काय ग लता हा सदा काय अभ्यास करतोय मोठमोठ्याने !! आज जागही त्याच्या आवाजानेच आली!! "
"काही कळत नाही आहो!! फक्त चंद्र नी तारे एवढंच काय ते कळलं मला !! " सदाची आई मिश्किल हसत म्हणाली.
बाबा सदाला हाक मारत म्हणाले.
"सदा आज शाळेत नाही कारे जायचं??"
सदा शेजारच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला,
"जायचय तर आज तर विशेष जायचं आहे!!"
"बरं बरं आटोप पटकन आता निघायचं आहे !! मला उशीर होतोय !!" बाबा घड्याळाकडे पाहत म्हणाले.
दोघेही आवरून निघाले. आज बाबांची सायकल नेहमी पेक्षा जरा हळूच चालली होती. कदाचित पुन्हा कधीच न परतून येण्यासाठी ती चालली होती. बाबा आज सदाला काही बोलतही न्हवंते. कित्येक वर्षांची सोबतीन आज सोडून जातानाही कायम सोबत रहायचं वचन देऊन जात तर नसेन ना , बाबांच्या डोळ्यात एक टिपूस आला होता. पण तो सदाला दिसायच्या आत बाबांनी पुसला.
"बाबा आज जातानाही आपण दोघे बरोबर जायचं?" तुम्ही येतान ना मला न्ह्यायला ??" सदा बाबांना विचारत होता.
"बाबा!!! बाबा !! काय झाल ???"
"काही नाहीरे सदा ?? " येईन मी !! "
सदा सायकल वरून उतरत होता . बाबा कडे कित्येक वेळ पाहत होता. बाबा आता राजू सायकल वाल्याकडे आले.
"राजु , अरे कसा आहेस ??"
"काय विनायक शेठ, कसं काय येणं केलं आमच्याकडे आज ?? सायकल काय त्रास देते की काय " अस म्हणून राजु दात सर्व दिसतील इतका मोठा हसला.
"विकायची आहे सायकल !!" बाबा जड शब्दाने बोलले.
"विनायक शेठ आहो , काय म्हणताय हे ?? पण का ??"
"पैशाचही गरज आहे थोडी!!" बाबा एकदम म्हणाले.
"विनायक शेठ या सायकलला तुम्ही किती जपता !! अशी एकदम विकून टाकायची म्हणजे ??"
"पर्याय नाहीरे दुसरा!!"
"हे बघा विनायक शेठ, हा व्यवहार आहे म्हणून, तुम्हाला मी पैसे देईल पण ही सायकल मी कोणाला विकू नाही शकणार!! तुमचं मन मी जाणतो!! तुम्ही पुन्हा मला माझे पैसे द्या आणि ही सायकल घेऊन जा !!! "
  बाबा सायकल राजूकडे ठेवून पायीच कामावर गेले. मुलाच्या स्वप्नासाठी आपल मन तिथे ठेवून गेले.
आज दिवस तसा त्यांना जाता जात न्हवता. आज संध्याकाळी सदाला घेऊन जाताना सायकल नाही दिसली तर त्याला काय सांगावं हा प्रश्न त्यांना पडला. पण खिशातील पैश्याकडे पाहून त्यांना त्याच्या दुर्बिणी शिवाय दुसरे काही दिसलेच नाही ...

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...