मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्बीण (कथा भाग २)

   कामावर जाताना बाबांच्या डोक्यात सदाला दुर्बीण कशी घेऊन द्यावी हाच विचार होता.  आपली परिस्थिती जेमतेमच पण मुलाची स्वप्न मात्र खूप श्रीमंत असे त्यांना वाटत होते.
  दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात.
"काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?"  बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे.
"नाही शेठ विशेष काही नाही!!"
"आल्यापासून पाहतोय कुठेतरी गुंग आहेस?"
"सदाशिवने काल दुर्बीण हवी आहे अशी मागणी केली, पण शेठ दुर्बीण घ्यायची म्हणजे ती महाग असणारच , त्याला त्यातून आकाशातले तारे पहायचे जवळून!!"
"पोराचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचं, आज दुर्बीण म्हणेन उद्या अजुन काही ,सगळेच असे पुरे करणार आहेस का लाड ?"
" नाही शेठ त्याला मला दुर्बीण घेऊन द्यायचीये!! हे एवढस स्वप्न मला पुर करायचं आहे!!"
"नक्की करशील रे विनायका !! पण कामाचा तान नको जास्त घेऊस !! "
"नाही !!"
    बाबा संध्याकाळी घरी आले दिवसभर विचार करून त्यांना काय करावे तेच कळेना.
"आई , बाबा आले आहेत !!" सदा घरात येणाऱ्या बाबांकडे बघत म्हणाला.
"काय रे सदा , आज अभ्यास नाही वाटत?"
" अंगणात बसतोय आता अभ्यासाला बाबा!!" सदा बाबांकडे पाहत म्हणाला आणि अंगणात निघून गेला.
"आज त्या कुळकर्ण्या सावकाराला ५००₹ मागून बघितले! तर म्हणे आदीचेच दिले नाहीत अजुन आणि आजून कर्ज कस देणार !!" बाबा आईकडे पाहत म्हणाले.
" आता पुन्हा कर्ज कशाला काढायचं?"
"लता सगळी चौकशी केली, त्या दुर्बिणीच्या बद्दल सगळी माहिती काढली मी म्हणून त्याला पैसे मागितले!!" बाबा उत्साहात बोलत होते.
" त्या दुर्बिणीच खुळ तुमच्या डोक्यातून गेलच नाही का आजुन?" आई एकदम रागात म्हणाली.
"खुळ काय म्हणतेयस लता , आपल्या मुलाचं स्वप्न म्हण हवं तर!"
"आहो पण आपल्याला जमणार का ते ??"
"प्रयत्न तर करूयात!!" बाबा अंगणातल्या सदा कडे पाहत म्हणाले.
बाहेर सदा आकाशातील चांदण्या मोजण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एखादा निखळणारा तर पाहून त्याकडे कुतूहलाने पाहत होता. बहुदा आपल्या स्वप्नांना जवळ करण्याचा प्रयत्न करत होता.
  बाबांना काही केल्या दुर्बिणी शिवाय काही दिसत नव्हत. सावकार कर्जही देत नाही म्हटल्यावर बाबांना दुसरा मार्गही सुचत नव्हता. खूप विचार झाल्यावर शेठना पैसे मागून पहायचं अस त्यानं ठरवल. अशाच विचारत आकाशात सूर्यकिरणांचा प्रकाश पडू लागला. रोजच्या प्रमाणे सगळ आवरून बाबा कामावर गेले.
शेठला पैश्याची मागणी कशी करावी हेच त्यांना कळेना. शेवटी त्यांनी विचारलेच.
"शेठजी , थोड विचारायचं होत तुम्हाला!!"
"अरे विनायका , बोल काय काम आहे ??" शेठजी कुतूहलाने विचारू लागले.
"शेठ मला ५००₹ मिळतील का ?" बाबा शेजारी ठेवलेल पुस्तकं पाहत म्हणाले.
"विनायका, कशाला रे हवे एवढे पैसे ??"
"सदाला दुर्बीण घ्यायची आहे!!"
"विनायका, असते तर नक्की दिले असते रे पैसे , पण सध्या तुझा शेठ थोडा अडचणीत आहे !!"
"ठीक आहे शेठ!!" बाबा बोलत बोलत सर्व काम करत होते. शेठ कढून ही पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांना आता पैसे मागावें तेच कळेना.
  स्वप्न पाहताना कदाचित मी कमी पडलो असेन पण माझ्या मुलाला प्रत्येक स्वप्न मिळावं असं बाबांना वाटत . दिवस सरला आणि बाबा आणीं सदा जेवण आटोपून निवांत आंगणात पडून चांदण्या पाहत होते .
"बाबा , ते पहा त्या चांदण्या एकत्र केल्या की एक चित्र तयार होते !!"सदा उत्साहाने म्हणत होता.
"कोणत रे सदा ??"
" आपल्या सायकलच!!"

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...