मुख्य सामग्रीवर वगळा

दुर्बीण ( कथा भाग ४) अंतिम भाग.

  संध्याकाळची वेळ झाली. बाबा एकटेच चालत सदाच्या शाळेकडे येत होते. त्यांना सदाला सायकल बद्दल काय सांगावं तेच कळत नव्हतं. विचाराचं नुसतं वादळ उठलं होत. तसेच ते शाळे जवळ आले. सदा लांबूनच चालत येताना त्यांना दिसला. आल्या बरोबर त्याने विचारलं,
"बाबा सायकल कुठे आहे?"
"अरे ती राजू कडे आहे!! खराब झाली ना म्हणून नीट करायला दिली!!"
  पण हे असं किती दिवस सांगत रहायचं. बाबांच्या मनानेच त्यांना विचारलं. पण सदाच्या चेहऱ्यावर आज त्यांना वेगळाच आनंद दिसत होता. तो अगदी खुश होता.
"काय रे सदा, काय झाले एवढे खुश व्हायला?"
"बाबा घरी गेल्यावर तुम्हाला सांगू , आई तुम्हीं दोघेही समोर असताना सांगेन!!"
"पण झाल तरी काय एवढं!!?" बाबा कुतूहलाने विचारत राहिले.
चालत चालत दोघेही घरी आले. सदा आत मध्ये गेला आणि हातपाय धुऊन दफ्तर आवरत बसला. बाबा स्वयंपाक घरात आईला बोलत होते.
"लता आज राजुला सायकल विकली मी!!" पहिले तर घेईचं ना विकत, मग म्हणाला विनायक शेठ ही सायकल मी पुन्हा तुम्हाला देणार जेव्हा पैसे परत देताल तेव्हा घेऊन जा !! बाबा आईला हातातले पैसे दाखवत म्हणाले.
पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला.
"आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३ ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??" सदा दोघांकडे बघत प्रश्न विचारत होता.
आई बाबा एकमेकांकडे पाहत नाही म्हणत होते.
"आई , त्या ताऱ्यांचा अभ्यास करत होतो ना मी !! त्याच चांदण्यांनी मला त्याचं घर शोधायचीं संधी दिलीये मला !!  आई बाबा मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो !! आणि मला बक्षिस मिळाले !!ती म्हणजे माझी आवडती "दुर्बीण"!!"
बाबाना काय बोलावं तेच कळेना . त्यांच्या डोळ्यात कित्येक आनंदाचे अश्रूं दाटले.
"सदा!!!!" म्हणत बाबांनी त्याला आपल्या मिठीत घेतले.
आईला काय बोलावे तेच कळत न्हवते.
"आता तरी आणताल ना सायकल ??" आई बाबांकडे पाहत म्हणाली.
"सायकल??" सदा बाबांना विचारतं म्हणाला.
"तुला दुर्बीण हवी म्हणून तुझ्या बाबांनी सायकल विकली!! पण तू तुज स्वप्न स्वतःच पूर्ण केला सदा!" आई सदाला जवळ घेत म्हणाली.
"बाबा मी म्हणालो होतो की दुर्बीण हवी आहे पण मला ती मिळवायची होती. या आकाशाला जिंकायचं होत बाबा मला.!!" चला बाबा आधी आपण तुमची सायकल आणु!!
सदा आणि बाबा चालत राजू कडे आले आपली सायकल घेऊन जाताना त्या दुर्बिणी साठी घेतलेले पैसे परत देऊन गेले.
जाताना एकच सुख होत दोघांमध्ये , सदा ने आकाशाला गवसणी घालण्याचा आणीं त्याला त्या आकाशा एवढं स्वप्न दाखवण्याचं समाधान मिळालं याच त्याच्या बाबांचं.
दोघेही घरी आले. रात्रीच्या समयी दुर्बिणीतून त्या चांदण्या पाहू लागले. चांदण्या पाहताना सदा एकदम म्हणाला.
"बाबा कविता म्हणा ना ..!! "
"कोणती रे सदा!!"
"स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये !! " सदा बाबांकडे पाहत म्हणाला. बाबाही आकाशाकडे पाहत कविता म्हणू लागले ...
" स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!

ब्रह्मांडा सम ध्येय माझे
स्वतःस मग मी शोधून पाहिले
अनंत स्वप्नात कुठे दिसता
माझेच मी मला न दिसले

का असे होते मला आज
ध्येय कोणते मनास लागले
दूरवरच्या त्या घरात का
उगीच मग मी स्वतःस पाहिले..!! "

"बाबा हि पृथ्वी आपल घर ना??" सदा मिश्कीलपणे म्हणाला
"हो रे !!" बाबाही त्याच्याकडे पाहत म्हणाले.
"मग हे घर कोणाचं??"

असे म्हणताच सदा आणि बाबा एकमेकांकडे पाहून मनसोक्त हसले...

समाप्त....

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...