Online

या online आणि offline चा जगात
नातीच आता सापडत नाही
कधी like आणि share मध्ये
कोणालाच मन कळत नाही

Accept केली तर मैत्री होते
पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही
Favourite list मध्ये आता
आपलीच माणसं दिसत नाही

कधी तुटतात नाती एका message मध्ये
इथे बोलायचीच गरज रहात नाही
कित्येक मित्र झालेत या जगात की
मैत्रीची किंमतच खरी कळतं नाही

कधी अनोळखी व्यक्तीशी बोलताना
शब्दच आता पुरत नाही
कट्ट्यावर बसून मित्रांना
बोलायलाच आता वेळ नाहीं

खरंच जग छोट झालंय
जिथे आपलेच लोक सापडत नाही
अनोळखी जगात या आता
मित्राची list ही जणु संपत नाही

Emoticons म्ह्णजे भावना असतात
पण मनातलं काहीच कळत नाही
Mobile कितीही smart झाला तरी
खऱ्या भावना ओळखु शकत नाही

कितीही स्वस्त झाले बोलणें तरी
कोणाला बोलायचं हेच कळतं नाही
कारण online आणि offline चा जगात
आपलेच लोक आता सापडत नाही
-योगेश खजानदार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...