न कळावे...!!!

"न कळावे सखे तुला का
भाव ते कवितेतले
तुझ्याचसाठी चंद्र नी तारे
वेचले मी जणु सुर जसे

कधी बोलुनी लाटांस या
आठवते ती सांज सखे
कधी शोधती क्षण हे आपुले
विरुन जाता पाहते कसे

का असे बोलती पाखरे
फुलांस आज ते पाहता जसे
किती गुंफली माळ मनाची
तरी तुला न कळते कसे

वार्‍यासही शोधून सापडेना
सुर जे हरवले असे
बेधुंद शब्दाच्या वादळात जणु
कित्येक भाव विरले कसे

सांग काय राहिले मनाचे
भाव जे अव्यक्त असे
सुर ही हरवले शब्द ही थकले
तरी मन हे अबोल कसे

न कळावे भाव तुला का
सखे माझ्या कवितेतले ...!!!"
-योगेश खजानदार




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...