मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर...!!(कथा भाग-२)

  "त्यावेळीही असाच निघून गेलास आणि आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच योगेश तु का निघून गेलास? मी तुषार बरोबर का निघून गेले हे तुला विचारावं असं का वाटतं नाही. त्या वेड्या मनातल प्रेम मी ओळखल होत रे!! पण माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणारा तुषार माझ्या सोबत होता. आणि त्याच प्रेम नाकारण्याची ताकद माझ्यात न्हवती !" प्रियाच्या मनात विचाराचं काहुर माजलं होत. योगेश गेल्या नंतर ही ती कित्येक वेळ तिथेच बसून होती.
  अखेर सर्व विचाराचा गोंधळ सोडून ती coffee shop मधून घरी आली. प्रियाची आई तिची वाटच पाहत होती. प्रिया काही न बोलता थेट आपल्या रूम मध्ये निघून गेली. हातात पेन घेऊन लिहू लागली.

प्रिय तुषार,
  "माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत. जणु मी पुन्हा पुन्हा जगतेय. तुझ्याचसाठी .!!

मनातल सार त्या वही वर लिहून प्रिया कित्येक वेळ आपले अश्रू ढाळत होती. "योगेश तुझ्या कित्येक प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे न्हवती पण तुझ प्रेम मी ओळखु नाही शकले असे नाहीरे!!"  प्रियाचे अश्रू जणु खूप काही बोलत होते. खूप वेळाने ती room मधून बाहेर आली. आईने सगळं काही ओळखल होत न राहवून ती बोलली
"मनातल सार मनातच राहील की खूप त्रास होतो प्रिया!! तुषार तुझ्या आयुष्यात होता!! आणि योगेश वर तुझ मनापासून प्रेम होत हे कधीच तुझ्याकडून ही लपलेलं नाही!! पण त्याला ते कधी कळलंच नाही!! तुषार ने तुझ्याकडे प्रेम मागितल फक्त,  तेही त्याच्या आयुष्याच्या अचानक झालेल्या सांजवेळी आणि तु त्याला नकार नाही दिलास. कारण त्यावेळी त्याला तुझी जास्त गरज होती!!"  आई पुढे बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणाली.
"आई आज coffee shop मध्ये योगेश भेटला होता!! आजही मला तो तसाच सोडून निघून गेला ज्यावेळी मी तुषार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता!!"
"आणि आजही तु त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असशील?" आई प्रियाकडे पाहत म्हणाली.
"खूप प्रयत्न केला!! पण तो नाही थांबला!! प्रिया अश्रू आवरत म्हणाली.
   कित्येक वेळ प्रिया आईला मनातल सार सांगत होती. तूषारचा आठवणींत अडकून ती योगेशला शोधण्याचा प्रयत्न करत होती. तुषार तिच्या आयुष्यातलं एक सुंदर पान होत. जे अचानक गळून पडल होत. त्या पानावर खूप काही लिहिल होत. जे कधीही पुसता न येण्यासारखे होत. पण योगेश तर एक सुंदर कविता होती जी सतत ओठांवर येतं होती.
  योगेशला पुन्हा भेटण्याची ओढ प्रियाला खूप होती. पुढचे कित्येक दिवस ती रोज त्या coffee shop मध्ये जात होती. पुन्हा योगेश तिला भेटेल आणि यावेळी त्याला असाच निघून जाऊ नाही द्यायचं अस ठरवून रोज ती तिथे जात होती. आणि एक दिवस अचानक तिच्या समोर कोणीतरी येऊ बसले. तो योगेशच होता.  प्रियाला त्याला समोर पाहून खूप आनंद झाला.
"तुझी वाट पाहता पाहता रोज coffee प्यायची सवय लागली मला!!" प्रियाला मनातला आनंद लपवताच आला नाही.
"तु रोज येतेस इथे? मी भेटेन पुन्हा म्हणून?? योगेश कुतूहलाने विचारत होता.
"हो!!"
पण का?
"कारण कित्येक गोष्टीं आजही अधुऱ्याच आहेत! ज्या मनात आहेत तुझ्याही, आणि माझ्याही!! खूप काही मला सांगायचय !! खूप काही तुझ्याकडून ऐकायचं आहे !!! " प्रिया त्या जुन्या नात्यास पुन्हा बोलकं करत होती. योगेशला मनातल सगळ काही सांगत होती!!!

क्रमशः ...

-योगेश खजानदार

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...