मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर‌...!!(कथा भाग १)

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. त्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना .कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तसाच आहे याचं तिला नवल वाटत होत. कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता. कारण कितीही झाल तरी तो तिचा जुना मित्र होता. कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जातं होते.
"नाहीरे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल! " प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली.
"मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी?
"नाही!!"
"म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्या बद्दल राग आहे तर?"
"नाहीरे!!" पण पुन्हा धिरच नाही झाला तुला बोलायचं!!"
"वेडे आपल्यातले नाते एवढं कमजोर न्हवते की ते असे संपून जावे!! योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. प्रियाला त्यावेळी योगेशकडे पाहणं अवघड चालल. कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते.
"पण मला आजही याचं दुःख वाटत की कोण तिरहाईक माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले. योगेश तुला आठवत तु मला रोज भेटायचास. कधी शक्य नाही झाले तरी फोन मेसेजेस करायचा. पण मला वेडीला ते कधी कळलंच नाही. तूषारच्या आधीपासून तु माझ्या आयुष्यात होतास. पण मी कधीच तुला ओळखु शकले नाही." 
"मी तरी कुठे माझ्या मनातल तुला सांगायचो सांग ना!! योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता. कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरले होते.
"त्याचवेळी मनातल सांगितलं असत तर कदाचित आपण असे नसतो भेटलो!" प्रिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती.
"सांगितलं असत तरी वेळ निघून गेली होती!!" कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस! आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता!!" योगेश भावनिक होऊन बोलत होता. कित्येक शब्दांचे भावणेचे बांध आता तुटले होते.
"माझही चुकलं होत त्यावेळी!!" कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे!!" प्रिया कॉफी कडे पाहत म्हणाली.
"बघना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय."
"होना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी!!"  प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती.
"आली ना!! खूप वेळा आली पण तु काही भेटली नाहीस पुन्हा!! Actually  तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे!! "  त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत!! की नात जर नीट नाही ना चाललं तर त्यातली refill बदलायची ,नात नाही बदलायच." योगेश अगदी सहज तिला जुन्या आठवणींत घेऊन जात होता.
"हो नात नाही बदलायच!!. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु!! माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला!! या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
"चल मी निघतो आता!! " प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच न्हवती.
"नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला!!"  प्रिया पुन्हा पुन्हा त्याला बोलत होती.
नक्की देईन पण आता नाही!! योगेश जाण्यास निघाला होता. पुन्हा तिला भेटण्याचं वचन देऊन.
  पण प्रिया तिथेच होती. संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता.  नात संपले तरी त्याची सुरवात पुन्हा करण्यास सांगत होता. कदाचित मनातलं सगळं सांगायला ते नात पुन्हा जोडत होता...

क्रमशः ...

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...