कोणीच काही बोलत नाही
मनके गेले झिजून
खड्ड्यातून चालतो आम्ही आता
सवय झाली सोसून
कधी इकडुन खड्डा दिसतो
जातो त्याला चुकवून
कळतच नाही तेव्हा आम्हाला
दुसरा खड्डा पाहून
रस्ते दुरुस्ती केली पाहिजे
सगळेच थकले बोलुन
गेले कित्येक जीव तरी
गप्प सगळे बघून
आले कित्येक नेते आणि
बोले सगळं भरभरून
खड्डेमुक्त महाराष्ट्र करतो
बोले फक्त तोंडभरून
कित्येक निधी याचे मंजुर
खड्डे न हाले जागेवरुन
रोजच सोसतो उद्याही सोसु
इलाजच नाही त्यावाचून
बुजलेच जर खड्डे सारे
बोलायच तरी कशावरून
गेले कित्येक जीव तरी
गप्प सगळे बघून
-योगेश खजानदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply