आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास
साथ हवी होती ती सावल्यांना
-योगेश खजानदार
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply