विरहं..!!

ठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही

आसवांनाही कधी निटस विचारत नाही
कित्येक दुख डोळ्यातुन वाहत नाही
पापण्यांचा दोष हा सारा जणु की
अश्रुं मधुनही तिला जाऊ देत नाही

किती हा एकटा प्रवास की अंत नाही
सोबत नसावी तिची हे ह्रदय मानत नाही
वाट अशी चालताना आज मझ
स्वतःस हरवुन गेलेलेच माहित नाही

शोधूनही कधी ती सापडत का नाही
बदलले क्षण तरी ओढ का जात नाही
ह्रदयातल्या कोपर्‍यात तिच असताना
आज मला ती काहीच का बोलत नाही

सरले पान ते पलटलेच नाही
काय लिहिले ते नीट वाचलेच नाही
अखेरच्या ओळीतले शब्द असे की
पाहुनही ते मी पाहिलेच नाही
-योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...