वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून आपल्या मुलांना आनंदात ठेवणारे ते बाबा असतात. सतत तुम्हाला प्रोत्साहन देणारे बाबा असतात. कधी कठोर तर कधी एखाद्या मित्रा सारखे वाटणारे ते बाबा असतात. बाबा असतात स्वतःची आवड बाजुला ठेवुन मुलांची आवड पुर्ण करणारे कारण आपल्या मुलांच्या डोळ्यात अश्रु पाहु न शकणारे ते बाबाच असतात.
मला आठवत मी लहानपणी बाबांच्या सायकलवर बसुन बाहेर मस्त फिरायला जायचो तेव्हा एखादं खेळणं दिसलं की मी ते घेण्याचा हट्ट करायचो आणि बाबा ते मला घेऊनही द्यायचे. अशी कित्येक खेळणी आजही तशीच आहेत जपुन ठेवलेली. कारण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचा आनंद पहाणारे ते बाबाच असतात. आजही त्या खेळण्याकडे पाहिलं की मला त्या सर्व गोष्टी आठवतात. पण जस जस मोठं होतं जातो तसे वडील आणि मुलगा यांच्यातली एक सज्ञा बदलत जाते.
एक मित्र म्हणुन बाबांनकडे पहाताना त्याच्यातले वेगळेच व्यक्तीमत्व जाणवते. आता हट्ट नाही तर जिद्द, चिकाटी आणि काहीतरी स्वतः मिळवण्याची ताकद त्याच्याकडुन मिळते. चर्चा, वादविवाद अशा कित्येक गोष्टी आमच्यात होतात. आपले विचार स्वतंत्र आणि निर्भीड असावे असा त्याचा अट्टाहास असतो. अगदी कित्येक गोष्टीत, विचारात आमची चर्चा होते. एक मार्गदर्शक म्हणून बाबांनकडे पहाताना एक वेगळीच त्याची ओळख होते. आणि एक मित्र म्हणून योग्य सल्ला देणारेही ते आपले बाबांच असतात.
बाबा असतात सतत आपल्या बरोबर अगदी सावली सारखे. एक शिक्षक म्हणुन, एक मित्र बनुन , एक मार्गदर्शक म्हणुन आणि एक सोबती होउन. अस म्हणतात मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आईवडिलांना लहानच असतो. पण मी म्हणतो मोठं व्हावंच कशाला. बाबां सोबत सायकलवर फिरायला आजही जावं असंच वाटतं. कारण कितीही मोठं झालं तरी जाच्या समोर पुन्हा लहान व्हावंस वाटतं ते बाबाच असतात...
बाबा...
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे, कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण, नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply