सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे का?.. मन का सारख काहीतरी विचार करतं.. आणि काहीच न सापडल्यावर उदास होऊन गप्प बसतं.. असंख्य विचारांच हे वादळ आता का कुठे थांबत नाही? ?. की विचार करुच नये आणि त्यावेळी मनाने अजुन असंख्य विचाराच गाठोडं समोर उघडून बसावं.. काहीच कळेनासं झालंय.. मनातल्या कोपर्यात कोणीतरी सतत का आठवावं .. विसरुन जावं त्यास म्हटलं तरी त्याने पुन्हा पुन्हा समोर का यावं ... असा गोंधळ झालाय सगळा म्हटलं तरी मन कोणाची तरी खुप आठवणं काढतंय अस सांगावं.. की सांगुच नये कोणास.. मग मनाच वादळ थांबेल तरी कस .. असा प्रश्न येतो.. मी आणि माझ मन म्हटलं तरी हे तिसर कोण येतं आमच्या मध्ये... आमच्या गप्पा मध्ये ही तिसरी कोण जिचा विषय हे मन सारखं काढतंय.. . गप्प बस रे मना.. म्हटलं तर त्याने पुन्हा पुन्हा तेच बोलावं.. समोरची व्यक्ती गप्प बसतवता येते.. पण या मनाच काय करावं.. फक्त आठवणं.. पण असं म्हणतात की आपल्याला ज्या व्यक्तीची आठवणं सारखी येते ती व्यक्तीही आपली तेवढीच आठवणं काढत असते.. खरंच अस असत का ??.. की फक्त मनाचे खेळ सगळे हे.. नकोच तो विचार पुन्हा आता.. नको रे मना .. तुलाही सहन होतं नाही आणि मलाही.. जाऊ दे तो विषय .. मग मन बंड करून उठावं.. हातात लेखणी घेऊन स्वतःस पानांवर उतरावं. . तरीही शांत झालं तर ठीक हे मन नाहीतरी पुन्हा मला छळत रहावं.. खरंच मनाचा ठाव शोधता येईल का??.. ..
-योगेश खजानदार...
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे, कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण, नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply