मन

काहीतरी राहून जावं
अस मन का असतं
झाडावरची पाने गळताना
उगाच ते पहात असतं

हे मिळावं ते रहावं
स्वतःस का सांगत असतं
काही तरी गमावल्यावर
लपुन का ते रडतं असतं

मी आहे माझ हे सर्व
माझ माझ का करत असतं
कुठेतरी सर्व हरवल्यावर
दोष का ते देतं असतं

सांग तरी काय चुकलं
कोणास ते विचारत असतं
उत्तर इथे नाही मिळताच
एकांतात का ते राहतं असतं

मन हे मनच अखेर
स्वतःचा तळ शोधत असतं
कुठेतरी रस्ता चुकल्यावर
वाट का ते शोधत असतं..
-योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...