तुला लिहिताना. . !!

पानांवर तुला लिहिताना
कित्येक वेळा तुझी आठवण येते
कधी ओठांवर ते हसु असतं
आणि मनामध्ये तुझे चित्र येते

कधी शब्दात शोधताना
पुन्हा उगाच तुझ्याकडे येते
भावना ती तुझीच असते
कविता होऊन माझ्याकडे येते

वहित लिहिलेले शब्द जेव्हा
पानांवर ती कोरत येते
चुरगळलेल्या पानांवरती
कित्येक शब्द सोडुन येते

वाचताना ओळ ती मनातील
ह्रदयास ती सांगत येते
लिहिलेल्या प्रत्येक शब्दांशी
नातं ती जोडत येते

मनातलंच ते सगळ माझ्या
ओठांवर का कधी येते
आणि पानांवर तुला लिहिताना
कित्येक वेळा तुझी आठवण येते
-योगेश खजानदार
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...