मुख्य सामग्रीवर वगळा

विरहं...


ती रात्र खुप काही सांगत होती. खिडकीतून बाहेर बघत मानसी एकटक लुकलुकत्या तार्‍यांकडे बघत होती. मनात विचारांचा नुसता गोंधळ झाला होता. तेवढ्यात किरण खोलीत येत मानसीचे ते रुप न्याहाळु लागला. तिच्या जवळ जात तो तसाच उभा राहिला. त्याच्याकडे न पहाताच ती त्याला म्हणु लागली
'किरण या आकाशतल्या चांदण्याच खरंच मला कौतुक वाटतं!!'
'का बरं?' किरण ही त्या चांदण्याकडे पाहु लागला.
'बघ ना इतक्या दुर असुनही कसे ते आपलेसे वाटतात. यामध्ये कुठतरी आपणही हरवलो आहोत याची जाणीव ते करतात. पण तरीही कधी ते परके असे वाटतंच नाहीत. प्रत्येक चांदणी आपल्याशी काहीतरी बोलतेय असं वाटतं.' मानसी मनातल सगळं सांगु लागली.
'मानसी काय झालंय सांगशील का?'
'काही नाही रे, असच वाटल म्हणुन म्हटले,  पण बघ ना नात्यांच ही असच असत ना? म्हणजे प्रत्येक नातं हे एक चांदणी सारखं असतं, आपल्या आयुष्यात ते सतत लुकलुकत असतं , कधी दिसेनास होतात तर कधी लख्ख प्रकाश पाडतात अगदी पौर्णिमेच्या चांदण्यान सारखं. आणि कधी अचानक नकळत तुटुनही जातात.'
मानसी डोळ्यातल पाणी टिपत म्हणतं होती.
'पार्थ ची आठवण येतेय?'
'नाही रे , पण आजही तो आपल्यात आहे असच वाटतं,  कोणत्याही क्षणी तो आई म्हणतं माझ्याकडे येईन आणि मला बिलगुन त्या डब्यातला खाऊ दे म्हणुन हट्ट करेन असं वाटतं.'
'मानसी आता पार्थला विसरायला हवं!'
किरणच्या या वाक्या सरशी मानसी पुर्ण कोसळली, तिला काय बोलावं तेच कळेना. किरणच्या कुशीत जाऊन ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. त्या चांदण्यात आपल्या बाळाला शोधत होती. पण एक चांदणी केव्हाच तुटुन गेली होती अगदी कायमची.
'किरण आपला पार्थ कधीच कारे येणार नाही?'
'मानसी आपला पार्थ आपल्या जवळच आहे, आपल्या मनात , आपल्या आठवणीत अगदी कायमचा.
मानसी आता स्वतःला सावरते झाली. किरणच्या खांद्यावर डोक ठेवुन कित्येक वेळ ती आकाशातल्या चांदण्या पहात राहिली. मनात पार्थला साठवत राहिली अगदी पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे लख्ख.

कुठेतरी आजही
तुझी आठवण कायम आहे
त्या चांदण्या मध्ये मी तुला
का उगाच शोधते आहे
अश्रुचा हा सागर जणु
मला का आज बोलतो आहे
आठवणींच्या लाटां मध्ये
तु कुठे हरवला आहे
येशील का रे आज पुन्हा
ही ओढ मझ अनावर आहे
तुझ्यासाठी मी पुन्हा
तिथेच येऊन उभी आहे
तुटलेला हा तारा जणु
क्षणभर का थांबला आहे
माझी आठवणही त्याला
कदाचित येत आहे
-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...