कदाचित त्या वाटा ही
तुझीच आठवण काढतात
तुझ्या सवे चाललेल्या
क्षणास शोधत बसतात
पाऊलखुणा त्या मातीतून
भुतकाळाची साक्ष देतात
एकट्या या मुसाफिरास
तुझीच साथ मागतात
तु पुन्हा फिरुन यावंस
हीच वाट पहातात
आणि थांबलेल्या मला
पुन्हा तुझीच ओढ लावतात
येईल वारा ऊन नी पाऊस
कसली चिंता करतात
तुझ्या सवे हा जीवन प्रवास
सगळं काही सहन करतात
त्या वाटा आता पुन्हा
मला तुझ्याच जवळ आणतात
एकट्या या मुसाफिरास
पुन्हा साथ तुझीच मागतात
-योगेश खजानदार
नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे, कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण, नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply