नातं आपलं

क्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं

विचार एकदा मनाला
तिथे कोण राहत होतं
कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये
सतत माझं नाव होतं

तु रुसावंस मी चिडावं
नातं हे दुरावलं होतं
तु न बोलावंस मी ही रागवावं
सगळच इथे बिघडलं होतं

मी माझा विसरून जावं
तुही कुठे हरवुन जावीसं
मग सारे बंध तुटावेत
इतक ते सैल नव्हतं

कधी आठवणीत पहावं
राग सारा विसरुन बघावं
नातं हे आपल आजही
तिथेच आपली वाट पाहतं होतं
- योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...