मुख्य सामग्रीवर वगळा

सांजभेट


तुला आठवतात ते दिवस जेव्हा आपण खुप बोलायचो. पण त्यावेळी नेमकं बोलण्याच साधन कमी पडायचं. मोबाईलला बॅलेन्स नाही, रोजचे मेसेज संपले अशा कित्येक कारणांनी आपलं बोलन अर्धवटच राहायचं. तेव्हा आपण दुसर्‍या दिवसाची आतुरतेने वाट पहायचो. सकाळच्या मेसेजेस ने सुरुवात करताना बोलन सुरु व्हायचं ते थेट रात्री गुड नाईट म्हणे पर्यंत. हे असे कित्येक क्षणांच्या आठवणी तो तिला सांगत होता.
पण बघ ना काळ बदलला आणि सगळच बदलुन गेल. आता पुर्वी पेक्षा जास्त साधन आले आहेत बोलायला. कित्येक अॅप्स, मेसेंजर .. जीवन अगदी स्मार्ट झालं ना यामुळे? पण सगळंच बदलय  .. तु ही मी पण ..!!  आता बोलायला वेळच नाही आपल्याला.  बॅलेन्स भरपुर आहे पण काय बोलायचं आणि का? हा प्रश्नच आहे. आपण एकमेकां पासुन खुप दुरावलो आहोत अस वाटतंय मला. निखळ हास्य विनोद करणारा मी आणि त्यावर तुझी अगदी मनसोक्त दिलेली हास्याची लकेर आता कुठेतरी हरवलीये गं!! बघ ना विनोद हा विनोद होतंच नाही ना आता त्यांच भांडणात रुपांतर व्हावं. हा कोणता दोष आहे ते तरी बघावं ना!! मनात कुठेतरी माझं जुन रुप तु दडवुन ठेवलं असशीलच ? ते एकदा नीट आठवुन बघ , तासनतास बोलणारे आपण, त्या बागे जवळ भेटण्याची ओढ, आणि त्या भेटी मध्ये मी दिलेल एक चाॅकलेट. त्या चाॅकलेटची गोडी आजही मनात तशीच आहे ना ? की बदलुन गेलंय सगळं आज?
  त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती आपल्या पासुन दुरावतेय याच दुख त्याला वाटतं होतं. तिलाही ते कळतं होतं. तेव्हा ती त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली . हे सगळं तुलाही आठवतं याचच मला समाधान आहे.  काळा सोबत प्रेमाची ओहोटी होणारी जोडपी कित्येक पाहिली पण तु तस कधी होऊच दिलं नाहीस. मला आठवतात ते दिवस. काळ बदलला पण प्रेम तसेच आहे. कुठेतरी मनात काहीतरी सलतय तुझ्याही आणि माझ्याही. मला हेच पाहिजे होतं. कधीतरी हे सगळं मोकळ करन खुप गरजेचं होतं रे!! चुक माझी ही असेन तुझी ही असेन आपण मिळुन त्या समजुन घ्याव्यात अस मला ही वाटतं. तिच्या या बोलण्याने तो कित्येक वेळ फक्त तिच्याकडे पहातच होता. तिने अगदी मनाचे दरवाजे त्याच्यासाठी मोकळे केले.
  दोघे कित्येक वेळ त्या समुद्र किनारी बसुन मनातील सल सांगत होते. दोघां मधील ते अंतर केव्हाच कमी झालं होतं. ती त्याला मनमोकळेपणाने सगळं सांगतं होती. त्या रुसलेल्या नात्याला कुठेतरी पुन्हा भरती आला होती. समुद्राची प्रत्येक लाट त्याच बोलण ऐकण्यास पायां जवळ येत होती. पण त्या दोघांना आता कोणाची चिंता नव्हती. होती फक्त ती आणि तो यांची एक सुंदर सांजभेट ..
मज वाट एक अधुरी दिसते
तुझी साथ हवी होती
त्या वळणावरती एकदा
तुज पहायची ओढ होती

मनात तुझ्या एक सल
तुला बोलायची होती
माझ्या मनाची बैचेनी
तुला सांगायची होती

ती आठवण पुन्हा
तुला करुन द्यायची होती
नात्याची गोडी आपल्या
पुन्हा अनुभवयाची होती

तुझ्या ओठांवरच्या शब्दांना
पुन्हा साथ द्यायची होती
तुझ्या सवे समुद्र किनारी
एक भेट व्हायची होती

तु सोबत असावी मज
आस एक मनाची होती
ती वाट अधुरी दिसते
तुझी साथ मला हवी होती
- योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...