मुख्य सामग्रीवर वगळा

नातं माझं...

   खरंच माझ काही चुकलं असेल तर मला माफ कर. .!!  अस म्हणणारी व्यक्ती आज शोधुनही सापडत नाही. नातं टिकवायला या गोष्टी खरंच खुप पुरेश्या आहेत अस मला वाटतं. कित्येक भांडणात त्या व्यक्तीचा  अहंकार आणि मीपणा किती आडवा येतो हे वेगळं सांगायची गरजच नाही. मुळात काय चुकलंय हे जाणुन न घेता फक्त माझंच बरोबर अस म्हणणारी व्यक्ती आयुष्यात खरंच खुप कमी नाती टिकवु शकतात. त्यामुळे अशा व्यक्ती सहसा आपली चुक मान्यच करत नाही आणि त्याचा त्रास त्याचा जवळच्या लोकांना झाल्या शिवाय राहत नाही.
   मनाचे धागे कुठेतरी अशा लोकांशी जोडलेले असतात त्यामुळे इतर व्यक्ती ते सहनही करतीन. पण त्यालाही काही मर्यादा नक्कीच असतात. ते म्हणतातच ना की नातं ताणुन धरल्याने ते कधीतरी तुटतं आणि त्याचा त्रास दोघांनाही नक्कीच होतो. पण हे नातं ताणुनच का द्यायच हा ही एक प्रश्न आहे.  मुळात ऐकाने नातं ताणलं तर दुसर्‍याने सैल सोडावं अस म्हणतात. पण जो सैल सोडतो त्याला त्या व्यक्तीच्या बेबंद वागण्याचा त्रास नक्कीच होतो नाही का?
  मग नक्की करायच तरी काय हा ही प्रश्न पडतो. नातं दोघांनीही ताणायच नाही हे ही मान्य आणि नातं सैल ही सोडायचं नाही हे ही मान्य.  पण मग होणारा त्रास कुठेतरी कमी व्हायलाच हवा. मग राहतो एकच मार्ग नातं तोडुन टाकायचं. पण त्याने आठवणींना भरती येते नक्कीच.  म्हणुन नातं हवंच असतं पण त्यामध्ये कधी त्याने माफी मागावी कधी आपण स्वतः माफी मागावी. कधी आपण चुक केली तर मोठ्या मनाने माफी मागावी हाही एक नातं टिकवायचा मार्ग नक्कीच आहे. आणि माफी मागण्यांने जर कोणाला कमीपणा वाटतं असेण तर अशी व्यक्ती कोणतंच नातं टिकवु शकत नाही हेही खरं.
  मग राहता राहिला प्रश्न त्रास होण्याचा. अशावेळी भांडणाचं मुळ कारण दोघांनीही लक्षात घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला भयंकर राग आला तर आपण आपल्या नात्यातील गोडवा जुन्या सुंदर आठवणी आठवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं राग कुठच्या कुठे निघुन जाईल. शेवटी लक्षात हेच ठेवायच की प्रत्येक नातं हे अनमोल असतं मग ते मैत्रीच असो किंवा इतर कोणतही ते समोर येताच आठवणींचा बाजार भरला पाहिजे. दुःखाचा डोंगर नकोच .. शेवटी मला असंच वाटतं नातं हे कसं होतं ..
"नातं एक असच होतं
कधी दुख कधी सुख होतं
सुखाच तिथे घर होतं
आणि मनात माझं प्रेम होतं

कधी माफी कधी रुसन होतं
क्षणात सारं जग होतं
दुख कुठे पसार होतं
आनंदाने नातं राहतं होतं

कधी माझ कधी तुझ होतं
आपुलकीची लाट होतं
समुद्रासारख अथांग होतं
आकाशा इतक मोठं होतं

नातं एक असच होत
कधी दुख कधी सुख होतं..!!"
-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...